शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

पुनर्विकासासाठी जादा एफएसआय

By admin | Updated: March 30, 2016 00:35 IST

महापालिकांच्या क्षेत्रातील धोकादायक इमारती पाडून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी जादा एफएसआय दिला जाईल आणि त्यासाठी लवकरच कायद्यात सुधारणा केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : महापालिकांच्या क्षेत्रातील धोकादायक इमारती पाडून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी जादा एफएसआय दिला जाईल आणि त्यासाठी लवकरच कायद्यात सुधारणा केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. अनधिकृत इमारती उभारणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद महापालिका कायद्यात लवकरच केली जाईल. एमआरटीपी कायद्यात तशी तरतूद असली तरी त्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागत असल्याने गुन्हेच दाखल होत नाहीत. अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणांमध्ये स्थानिक प्राधिकरण वा इतर ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे समोर आले तर त्यांना सहआरोपी केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अतिधोकादायक इमारतींसंदर्भात मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) तयार करण्यात आली आहे. या एसओपी उच्च न्यायालयाने मान्य केल्या असून सर्व महानगरपालिकांनी या एसओपींची अंमलबजावणी करावी, असे निर्देश नगरविकास विभागामार्फत देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या अपघातासंदर्भात विधानसभा सदस्य अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, संजय केळकर, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले होते. सदर धोकादायक इमारत रिकामी करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार इमारत रिकामी करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. ठाणे येथील अनिधकृत आणि धोकादायक इमारतीसंदर्भात भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त (अतिक्रमण) या पदाची निर्मिती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)भाडेकरूंच्या हितसंरक्षणासाठीमोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास मालक इच्छुक नसतात. इमारत पडावी आणि भाडेकरूचा दावा संपुष्टात यावा, असा त्याचा प्रयत्न असतो. या पार्श्वभूमीवर, इमारतीचा पुनर्विकास करण्यास मालकाने समोर यावे म्हणून आणि भाडेकरुंच्या हितसंरक्षणासाठी जादा एफएसआय दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.पोलीस गृहनिर्माणसाठी ५०० कोटी राज्यात पोलिसांसाठी घरे बांधण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची परवानगी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला देण्यात आली आहे. पोलिसांना मालकी हक्काने घरे बांधून देण्यासाठी जे विकासक समोर येतील त्यांना बीओटीवर परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर, तळेगाव दशासरी आणि मंगरूळ दस्तगीर येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबतचा प्रश्न काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि वीरेंद्र जगताप, डॉ. सुनील देशमुख यांनी विचारला होता. शहरी आणि ग्रामीण असा भेद न करता पोलिसांसाठी नवीन घरे तसेच दुरुस्तीचा निधी दिला जाईल, असे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.