शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर ‘अतिरिक्त’ संकट

By admin | Updated: August 29, 2015 02:37 IST

विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक नियुक्तीचे नवे निकष असलेले आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळेत ६० विद्यार्थ्यांमागे दोन, उच्च प्राथमिक

मुंबई : विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक नियुक्तीचे नवे निकष असलेले आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळेत ६० विद्यार्थ्यांमागे दोन, उच्च प्राथमिक शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे दोन तर माध्यमिक शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट कोसळेल, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र ही भीती अनाठायी ठरवत उलट अधिक शिक्षकांची गरज भासेल, असा दावा सरकारने केला आहे. नव्या निकषांनुसार प्राथमिक (इयत्ता १ ली ते ४थी किंवा १ली ते ५वी) शाळांमध्ये ६० विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असतील व त्यानंतर वाढ होणाऱ्या प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त शिक्षक नियुक्त करावा लागेल. एखाद्या प्राथमिक शाळेत वर्ग ३ किंवा ४ किंवा ५ मध्ये एकाच वर्गात कमीत कमी २० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील, तर त्या वर्गासाठी वेगळे शिक्षक नेमावे लागतील. मात्र तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्याने संपूर्ण शाळेत शिकत असलेल्या एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संख्या त्यासाठी विचारात घ्यावी लागेल. उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५वी ते ७वी किंवा ६वी ते ८वी) नवीन शाळा सुरू होत असल्यास आणि पहिल्या वर्षी फक्त सहावा वर्ग असल्यास ३५ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक (एक विज्ञान-गणित आणि एक भाषा) नियुक्त करावा लागेल. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची पदेप्राथमिक शाळा - नवीन शाळेत विद्यार्थीसंख्या १५० पेक्षा अधिक झाल्यास मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी लागेल, तर सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांत विद्यार्थीसंख्या १३५ पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार नाही.उच्च प्राथमिक शाळा - नवीन शाळेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी लागेल, तर सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार नाही.माध्यमिक शाळा - १०० पेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी लागेल, तर सध्या अस्तित्वातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही.तुकडी व्यवस्था बंद केल्यामुळे ज्या वर्गामध्ये निकषापेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास जादा शिक्षक पद देण्यात येईल. अशा अतिरिक्त शिक्षकाने वर्ग भरवण्याकरिता त्या शाळेने अतिरिक्त खोली बांधल्या-नंतरच ते पद भरण्याची परवानगी देण्यात येईल.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार हा निर्णय घेतला असून, यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना त्याच तालुक्यात नियुक्त केले जाणार आहे. उलटपक्षी या निर्णयामुळे शिक्षकांची नवीन ३ ते ४ हजार पदे भरावी लागतील. त्यामुळे कुठल्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. -विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्रशिक्षण हक्क कायद्यानुसार घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका ९वी व १०वी या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना बसणार आहे. यामुळे माध्यमिक शाळांमध्ये तीनऐवजी एका शिक्षकाची गरज राहील. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील. - रामनाथ मोते, शिक्षक आमदार