शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तारण मालमत्तांची नियमबाह्य विक्री

By admin | Updated: September 22, 2015 01:34 IST

राज्य सहकारी बँकेमध्ये काही संस्थांना विनातारण कर्जवाटप करण्यात आले, तर दुसरीकडे काही थकबाकीदार साखर कारखान्यांची तारण मालमत्ता नियमबाह्यपणे

नामदेव मोरे, नवी मुंबईराज्य सहकारी बँकेमध्ये काही संस्थांना विनातारण कर्जवाटप करण्यात आले, तर दुसरीकडे काही थकबाकीदार साखर कारखान्यांची तारण मालमत्ता नियमबाह्यपणे विक्री करून बँकेला १०७ कोटी ४७ लाख ७८ हजार रुपयांच्या खड्ड्यात घातले गेल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. राज्य शिखर बँकेच्या माध्यमातून तत्कालीन संचालक मंडळाने चार सहकारी गारमेंट्सना १ कोटी ७७ लाख ३१ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. मात्र, कर्ज देताना लघुव्यवसायासाठी सूक्ष्म व लघू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत निकषांचे उल्लंघन केले गेले. शिवाय, या संस्थांची स्थावर मालमत्ता तारण करून घेतली नाही. परिणामी, दिलेल्या कर्जाची वसुली झाली नाही. चौकशी अधिकाऱ्यांनी चार क्रमांकाच्या आरोपामध्ये याविषयी तपशील दिला आहे. राज्यातील ३ सूतगिरण्या व ३ साखर कारखान्यांना कर्जाची वसुली करण्यासाठी सरफेसी (सेक्युरिटायझेशन) कायद्याअंतर्गत तारण मालमत्तेची विक्री करताना योग्य कार्यवाही केली गेली नाही. विक्रीचा व्यवहार लांबलेला असताना नव्याने अद्ययावत मूल्यांकन करून घेणे आवश्यक होते. तथापि, तसे न करता बँकेच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला मालमत्ता विकली. अद्ययावत मूल्यांकन करून न घेता त्याची विक्री करण्यात आली. योग्य व पारदर्शक विक्री प्रक्रिया न राबविल्यामुळे मालमत्ता विकूनही कर्जाची संपूर्ण रक्कम वसूल झाली नाही. परिणामी, बँकेला ८६ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांचे नुकसान झाले. सहकारी संस्थांची मालमत्ता विक्री करण्यापूर्वी विक्रीची निविदा किमान तीन वेळा प्रसिद्ध करणे आवश्यक होते, परंतु तसे न करता राखीव किमतीपेक्षाही कमी किमतीला मालमत्तांची विक्री केली. या व्यवहारामध्ये बँकेला १९ कोटी १४ लाख ५१ हजारांचे नुकसान झाले.