शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी

By admin | Updated: March 5, 2017 04:43 IST

मॉन्सून चांगला झाल्याने यंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १४.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठी असल्याने, यंदा पाणी

पुणे : मॉन्सून चांगला झाल्याने यंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १४.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठी असल्याने, यंदा पाणी टंचाईच्या झळा पुणेकरांना बसणार नाहीत. तसेच जिल्ह्यातील उजनी धरणासह, कोयना, राधानगरी, वारणा, धोम या प्रमुख धरणातील पाणी पातळी देखील सरासरी ५० टक्के असल्याने पश्चिम महाराष्ट्राला एप्रिल-मे महिन्यात पाणीबाणी जाणवणार नाही. चांगल्या मॉन्सूनमुळे भिमा खोऱ्याबरोबरच कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांत निम्मा पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या डिंभे धरणात ६.१९ टीएमसी (४९.५६ टक्के), भामा-आसखेड ४.७९ (६२.४६), चासकमान २.७९ (३६.८९) आणि पवना धरणात ४.७२ टीएमसी (५५.४५) पाणीसाठा आहे. गुंजवणी १.०३ (४७.५६ टक्के), निरा देवधर ४.७२ (४०.२३), भाटघर १०.३४ (४४) आणि वीर धरणात ७.२८ टीएमसी (७७.३८) पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उजनी धरणातही २८.२२ टीएमसी (५२.६७ टक्के) पाणीसाठा आहे. राज्यासाठी वीज निर्मिती आणि सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या कोयना धरणात तब्बल ४९.९५ टीएमसी (४९.८९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. वारणा धरणात १६.१५ (५८.६८), राधानगरी ३.७२ (४७.८७), दूधगंगा १४.६४ (६१) आणि ऊरमोडी धरणांत ७.८८ टीएमसी (८१.६८) पाणी शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख धरणांत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने, यंदा उन्हाची तीव्रता वाढली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाईची फारशी जाणवणार नसल्याचे चित्र आहे. - पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून पाणी पुरवठा होता. या धरणांची क्षमता २९ टीएमसी असून, सध्या त्यात १४.३९ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगावमध्ये ५.६३ (४३.९० टक्के), पानशेत ७.३८ (६९.२५) व खडकवासला धरणात १.३२ टीएमसी (६६.८४) पाणीसाठा आहे. गळतीमुळे टेमघर धरणाची दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी तेथील पाणीसाठी ०.०७ टीएमसीपर्यंत (१.७७ टक्के) खाली करण्यात आला आहे. या चारही धरणांत मिळून तब्बल ४९.३५ टक्के पाणीसाठा असल्याने, यंदा शहराला उन्हाळ््यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. गेल्यावर्षी खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांत मिळून केवळ ८.०५ टीएमसी (२७.६१ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.