शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

‘स्पीड गव्हर्नर’ला मुदतवाढ, ९५० बसेस मार्गावर

By admin | Updated: April 27, 2016 18:35 IST

वेग नियंत्रणासाठी एसटी बसला ‘स्पीड गव्हर्नर’ आवश्यक करण्यात आले आहे. मात्र राज्यातील जुन्या बसेसला हे मीटर लावण्यात आलेले नाही. परिणामी उपप्रादेशिक परिवहन विभागाने

- विलास गावंडे,  यवतमाळ
 
वेग नियंत्रणासाठी एसटी बसला ‘स्पीड गव्हर्नर’ आवश्यक करण्यात आले आहे. मात्र राज्यातील जुन्या बसेसला हे मीटर लावण्यात आलेले नाही. परिणामी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मुदत संपलेल्या ९५० बसेसचे पासिंग थांबविले होते. महामंडळाला दररोज एक कोटी रुपयांच्या नुकसानीला मुकावे लागत होते. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’ने २१ एप्रिल रोजी प्रसिध्द केले. त्याचदिवशी ‘स्पीड गव्हर्नर’ला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली. त्यामुळे रोखलेल्या बसेसचे पासिंग करून त्या मार्गावर निघाल्या आहे.
१ आॅक्टोबर २०१५ पूर्वी तयार झालेल्या सुमारे दहा हजार बसेसला ‘स्पीड गव्हर्नर’ मीटर लावण्यात आलेले नाही. टप्प्याटप्प्याने पासिंगसाठी जात असलेल्या बसेस आरटीओकडून परत पाठविल्या जात होत्या. सुरुवातीला असलेला शंभरचा आकडा २० दिवसात ९५० वर पोहोचला होता. मीटर लावण्यासाठी दीर्घकाळ मिळाल्यानंतर एसटीने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे भविष्यात सुमारे दहा हजार बसेसचे पासिंग रोखण्याची शक्यता वाढली होती. शिवाय दररोज नुकसानीचा आकडा वाढत होता. २० दिवसात २० कोटी रुपयांचे नुकसान एसटीचे झाले. ही बाब ‘लोकमत’ने मांडली होती. याची दखल घेत एसटी महामंडळाने तत्काळ हालचाली केल्या. त्यामुळे या मीटरसाठी ३१ मेपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
ऐन हंगामाच्या काळात शेकडो बसेस पासिंग नसल्याने आगार आणि विभागीय नियंत्रक कार्यालय परिसराची शोभा वाढवित होत्या. यामध्ये महामंडळाचे २० दिवसात सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले. थोड्याथोडक्या नुकसानीसाठी कामगारांवर प्रसंगी निलंबणासारखी कारवाई केली जाते. पासिंगअभावी २० कोटी रुपयांवर नुकसान एसटी महामंडळाचे झाले आहे. यासाठी जबाबदार असणाºयांवर कारवाई आणि नुकसानीची रक्कम वसुलीचा प्रश्न कायम आहे. महामंडळाने एसटीच्या हितासाठी संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे.
 
दोन तिकीटांच्या दहशतीतून मुक्तता
प्रवाशांना द्याव्या लागणाºया दोन तिकीटातूनही वाहकांची मुक्तता झाली आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १५ एप्रिल रोजी प्रसिध्द केले होते. १७ एप्रिलपासून सहायता निधीची रक्कम एक रुपया प्रवास भाड्याच्या तिकीटातच समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना आता एकच तिकीट द्यावे लागत आहे.
एसटी महामंडळाने ‘हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी’ योजना १ एप्रिलपासून सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून प्रवासभाड्याशिवाय एक रुपया वेगळे शुल्क आकारले जात आहे. ही रक्कम प्रवासभाड्यासाठी दिल्या जाणाºया तिकीटातच समाविष्ट करण्याची सोय तिकीट मशीनमध्ये करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे एका प्रवाशामागे दोन तिकीट वाहकांना फाडाव्या लागत होत्या. यात नजरचूक झाल्यास बस तपासणीत विनातिकीट प्रवासी आढळल्यास वाहकांना कारवाईची भीती होती. आता त्यांची यातून मुक्तता झाली आहे.