शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ

By admin | Updated: July 18, 2016 04:38 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.

विवेक भुसे,

पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे केवळ तीन महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांनी टोल वसुलीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.विशेष म्हणजे टोल कंपनी वाहनांची संख्येत फेरफार करते, असे आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आणि टोलचा पाठपुरावा केल्यानंतर आलेली नवी आकडेवारी काहीशी समाधानकारक आहे.आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये १३ लाख वाहने वाढली होती़ मात्र, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये तब्बल ६१ लाख वाहने वाढली असल्याचे दिसून येत आहे़ तसेच एप्रिल ते जूनमध्ये १३३ कोटी ७९ लाख ५२ हजार ४१३ रुपये टोल वसुली झाली. मागीलवर्षी याच काळात ११३ कोटी १६ लाख २० हजार २४४ रुपयांचा टोल वसूल झाला होता़२०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची माहिती आयआरबी कंपनीने सादर केली असून त्यात आजवरची सर्वाधिक वाहनसंख्या आणि टोल वसुलीतील वाढ दिसून आली आहे़ एक्स्प्रेस वे तसेच इतर महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. परिणामी टोलची रक्कमही कमी दाखविली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. पुणे -कोल्हापूर मार्गावरील किणी टोलनाक्यावर दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेली पाहणी आणि टोल कंपनीने दाखविलेल्या वाहनांच्या संख्येत मोठा फरक आढळला होता.आता तर टोल बंद करा!टोलवसुली करणाऱ्या कंपनीनेच उपरोक्त आकडेवारी दिली असल्याने ती खरी असणाऱ टोलमुक्तीचे आश्वासन देणारे आता काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे़ माहिती अधिकार कायद्याच्या बडग्यामुळे ही माहिती गेल्या वर्षी पुढे आली, तेव्हापासूनच टोल बंद झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे़- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचराज्य शासनाने माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांना अभ्यास करुन अहवाल देण्यास सांगितले होते़ त्यांनी शासनाला अहवाल दिला असून टोलमुक्तीसाठी काय करता येईल, याचा कृती अहवाल शासन तयार करीत आहे़