शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ

By admin | Updated: July 18, 2016 04:38 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.

विवेक भुसे,

पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे केवळ तीन महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांनी टोल वसुलीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.विशेष म्हणजे टोल कंपनी वाहनांची संख्येत फेरफार करते, असे आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आणि टोलचा पाठपुरावा केल्यानंतर आलेली नवी आकडेवारी काहीशी समाधानकारक आहे.आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये १३ लाख वाहने वाढली होती़ मात्र, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये तब्बल ६१ लाख वाहने वाढली असल्याचे दिसून येत आहे़ तसेच एप्रिल ते जूनमध्ये १३३ कोटी ७९ लाख ५२ हजार ४१३ रुपये टोल वसुली झाली. मागीलवर्षी याच काळात ११३ कोटी १६ लाख २० हजार २४४ रुपयांचा टोल वसूल झाला होता़२०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची माहिती आयआरबी कंपनीने सादर केली असून त्यात आजवरची सर्वाधिक वाहनसंख्या आणि टोल वसुलीतील वाढ दिसून आली आहे़ एक्स्प्रेस वे तसेच इतर महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. परिणामी टोलची रक्कमही कमी दाखविली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. पुणे -कोल्हापूर मार्गावरील किणी टोलनाक्यावर दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेली पाहणी आणि टोल कंपनीने दाखविलेल्या वाहनांच्या संख्येत मोठा फरक आढळला होता.आता तर टोल बंद करा!टोलवसुली करणाऱ्या कंपनीनेच उपरोक्त आकडेवारी दिली असल्याने ती खरी असणाऱ टोलमुक्तीचे आश्वासन देणारे आता काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे़ माहिती अधिकार कायद्याच्या बडग्यामुळे ही माहिती गेल्या वर्षी पुढे आली, तेव्हापासूनच टोल बंद झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे़- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचराज्य शासनाने माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांना अभ्यास करुन अहवाल देण्यास सांगितले होते़ त्यांनी शासनाला अहवाल दिला असून टोलमुक्तीसाठी काय करता येईल, याचा कृती अहवाल शासन तयार करीत आहे़