शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

एक्स्प्रेस वेवर बसची डम्परला धडक

By admin | Updated: September 23, 2015 01:37 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताला काही तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत

खालापूर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताला काही तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत असलेल्या रिकाम्या डम्परला तेलंगणा राज्य परिवहन मंडळाची बस धडकून झालेल्या अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर बस डम्परमध्ये अडकली होती. एक्स्प्रेस वेवर सुरक्षेचे नियमच पाळले जात नसल्याचे या अपघातानंतर समोर आले आहे.तेलंगणा राज्य परिवहन मंडळाची (एपी २९-२-३४२९) बस मुंबईतून तेलंगणातील मेहबूब नगर येथे जात होती. खालापूर टोलनाका पास केल्यानंतर खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत असलेला डम्पर (एमएच ४६ एफ ०३३६), बस चालकाला न दिसल्याने भरधाव वेगातील बस डम्परला धडकली. या अपघातात बसचा चालक पद्मनाभन, कंडक्टर वेकंटय्या, अर्शद शेख, बाळासाहेब पाटील हे व ट्रकचा क्लीनर अतुल साहुबाव दाते हे किरकोळ जखमी झाले. डम्परला धडकल्याने बसची डावी बाजू कापली गेली. सुदैवाने या अपघातातून मोठी जीवितहानी टळली. सोमवारी झालेल्या अपघातातही क्वॉलीस डम्परला जाऊन धडकली होती. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताची माहिती मिळताच खोपोलीचे पोलीस निरीक्षक जयसिंह तांबे व महामार्ग विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते.एक्स्प्रेस वेवरील प्रवास धोकादायक असल्याचे मंगळवारी झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात वाहने धावत असताना उलट दिशेने डम्पर आलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. एक्स्प्रेस वेवर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अनेकदा ही वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. एक्स्प्रेस वेवर खाजगी प्रवासी बस व अन्य वाहने खुलेआम प्रवासी घेत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे. यामुळे मोठ्या अपघाताची भीती असल्याने अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.