शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

विसर्जनस्थळांवर अंनिसचे लक्ष

By admin | Updated: September 3, 2016 01:51 IST

राज्यातील बाप्पाच्या प्रमुख विसर्जनस्थळांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अधिकाधिक पर्यायी

- चेतन ननावरे, मुंबईराज्यातील बाप्पाच्या प्रमुख विसर्जनस्थळांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अधिकाधिक पर्यायी विसर्जनस्थळांचा वापर करावा, असे आवाहन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने अंनिस या यंत्रणेवर नजर ठेवणार आहे.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी अंनिसची मागणी आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तसे आवाहन केले आहे. याआधी न्यायालयानेही आदेश देत नद्या, सरोवर, समुद्र आणि नैसर्गिक स्रोतांमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नैसर्गिक विसर्जनस्थळांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचाऱ्यांनी भाविकांना पर्यायी विसर्जनाची विनंती करण्याचे आदेश आहेत. गेल्या वर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यात या आदेशाच्या कडक अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र बहुतेक जिल्ह्यांत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका-महापालिका कर्मचारी आणि पोलीस प्रशासन याबाबत उदासीन भूमिकेत दिसतात. त्यामुळे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया अशा प्रमुख विसर्जनस्थळांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि विविध प्रमुख जिल्ह्यांत अंनिसचे कार्यकर्ते विसर्जनाच्या सर्व दिवशी चित्रीकरण करतील. यंत्रणांनी आदेशांचे पालन करावेप्रत्येक नैसर्गिक विसर्जनस्थळाशेजारी प्रशासनाने मोठा टब, तात्पुरता हौद अशा पर्यायी विसर्जन व्यवस्था उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक विसर्जनस्थळी येणाऱ्या भाविकांना त्याचा वापर करण्याचे आवाहन करावे. शिवाय पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित करणे, हा गुन्हा असल्याची माहितीही भाविकांना द्यायला हवी. अंनिसचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी अशाप्रकारे आवाहन करत असतात. मात्र यापुढे संबंधित यंत्रणांनीही या आदेशाचे पालन करावे, अशी अंनिसची मागणी आहे. नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी यंत्रणांनी तयार राहावे, असा इशारा अंनिसने दिला आहे.