शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनस्थळांवर अंनिसचे लक्ष

By admin | Updated: September 3, 2016 01:51 IST

राज्यातील बाप्पाच्या प्रमुख विसर्जनस्थळांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अधिकाधिक पर्यायी

- चेतन ननावरे, मुंबईराज्यातील बाप्पाच्या प्रमुख विसर्जनस्थळांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अधिकाधिक पर्यायी विसर्जनस्थळांचा वापर करावा, असे आवाहन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने अंनिस या यंत्रणेवर नजर ठेवणार आहे.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी अंनिसची मागणी आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तसे आवाहन केले आहे. याआधी न्यायालयानेही आदेश देत नद्या, सरोवर, समुद्र आणि नैसर्गिक स्रोतांमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नैसर्गिक विसर्जनस्थळांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचाऱ्यांनी भाविकांना पर्यायी विसर्जनाची विनंती करण्याचे आदेश आहेत. गेल्या वर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यात या आदेशाच्या कडक अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र बहुतेक जिल्ह्यांत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका-महापालिका कर्मचारी आणि पोलीस प्रशासन याबाबत उदासीन भूमिकेत दिसतात. त्यामुळे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया अशा प्रमुख विसर्जनस्थळांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि विविध प्रमुख जिल्ह्यांत अंनिसचे कार्यकर्ते विसर्जनाच्या सर्व दिवशी चित्रीकरण करतील. यंत्रणांनी आदेशांचे पालन करावेप्रत्येक नैसर्गिक विसर्जनस्थळाशेजारी प्रशासनाने मोठा टब, तात्पुरता हौद अशा पर्यायी विसर्जन व्यवस्था उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक विसर्जनस्थळी येणाऱ्या भाविकांना त्याचा वापर करण्याचे आवाहन करावे. शिवाय पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित करणे, हा गुन्हा असल्याची माहितीही भाविकांना द्यायला हवी. अंनिसचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी अशाप्रकारे आवाहन करत असतात. मात्र यापुढे संबंधित यंत्रणांनीही या आदेशाचे पालन करावे, अशी अंनिसची मागणी आहे. नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी यंत्रणांनी तयार राहावे, असा इशारा अंनिसने दिला आहे.