शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पुनर्वसनाबाबत भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: June 6, 2017 05:50 IST

पारसिक बोगद्याच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पारसिक बोगद्याच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘हे अगदी गंभीर आणि महत्त्वाचे प्रकरण आहे. पावसाळ्यात भूस्खलन झाले झोपडपट्टीवासीयांसोबतच रेल्वे प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे झोपडपट्ट्या तातडीने हटवणे गरजेचे आहे,’ असे न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने म्हटले. उच्च न्यायालयाने जुलै २०१६ मध्ये पारसिक बोगद्याच्या आजूबाजूच्या झोपड्या हटविण्यास स्थगिती दिली होती. ही स्थगिती हटविण्यात यावी, यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गेल्या जून महिन्यात ठाणे महापालिकेने पारसिक बोगद्याच्या जवळील सुमारे २०० झोपडपट्ट्यांना नोटीस बजावली होती. तिला येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळीच उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला काहीही कारवाई न करण्याचे अंतरिम निर्देश दिले होते. १३ जूनपर्यंतची वेळठाणे महापालिकेने नोटीस बजावलेल्या काही झोपड्या ठाणे महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येतात, तर काही राज्य सरकारच्या वनविभागाच्या अखत्यारीत येतात. ठाणे महापालिकेने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने, सोमवारी खंडपीठाने राज्य सरकारला १३ जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.