शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश उघड

By admin | Updated: June 24, 2017 04:35 IST

शेतजमिनी मागण्याच्या नावाखाली नेवाळीत झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, या माहितीवर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतजमिनी मागण्याच्या नावाखाली नेवाळीत झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, या माहितीवर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग ठाम आहेत. सध्या तरी शंभराहून अधिक आरोपी असल्याचा अंदाज आहे. पोलिसांवर हल्ला चढवणाऱ्या आंदोलकांची गय केली जाणार नाही. पण या पूर्वनियोजित हल्ल्याची पुरेशी माहिती गोळा करण्यात पोलिसांची गुप्तचर शाखा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. नेवाळीच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष अडचणीत आले आहेत. या आंदोलनावेळी पोलिसांवर झालेली दगडफेक, पोलिसांच्या व्हॅनसह अन्य वाहने जाळण्याच्या घटनांमुळे आंदोलक पुरेशा तयारीनिशी आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावर वर्षभर शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, परंतु आजवर असा हिंसाचार झाला नसल्याचे पोलीस सांगतात. त्यामुळे हे आंदोलन कोणी पेटवले, याचा शोध सुरू झाला आहे. गुरुवारच्या हिंसाचाराची पद्धती पाहता, तो पूर्वनियोजित होता असेच दिसते. आंदोलनस्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त होता, परंतु पोलिसांवर वेगवेगळ्या दिशेने दगडफेक होत होती. एका गटाकडे पोलिसांनी मोर्चा वळवला, की दुसऱ्या दिशेने दुसरा गट पोलिसांवर हल्ला चढवायचा. आंदोलनस्थळी रस्त्याचे काम सुरू असल्याने दगडांचा खच पडलेला होता. दगडफेकीसाठी आंदोलकांनी त्याचाच वापर केला. हिंसाचाराची एकूणच पद्धत पाहता, हा हल्ला सुनियोजित असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. घटनास्थळी पोलिसांवर जीवघेणा हल्ला होत असतानाही पोलीस उपायुक्त भारद्वाज यांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले. त्या वेळची गरज आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी गोळीबारासह सर्वच निर्णय योग्य तऱ्हेने घेतल्याचा दावाही आयुक्तांनी केला. आंदोलकांनी हिंसाचाराची एवढी तयारी केल्याची पूर्वकल्पना पोलिसांच्या गोपनीय शाखेला यायला हवी होती. त्यामुळे त्याची नक्कीच चौकशी केली जाईल. गोपनीय शाखेला या प्रकरणात मी अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.पोलिसांवर हल्ला केल्यानेच गोळीबार - सिंग नेवाळीत आंदोलकांना पांगविण्यासाठी आधी लाठीमार करण्यात आला, पण आंदोलक पांगले नाहीत. दगडफेक सुरू राहिली. पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाल्याने आंदोलकांना पांगविण्यासाठी पेलेट गनचा वापर करत गोळीबार करावा लागल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. छर्ऱ्यांच्या बंदुकीच्या वापरात जीव जाण्याची भीती नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहने फोडल्याचा इन्कारआंदोलनानंतर स्थानिक पोलिसांनी गुरुवारी रात्री नेवाळी भागातील घरांच्या खिडक्या, गाड्या, दुचाकी वाहने, रिक्षांची तोडफोड केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यावरही अशी तोडफोड झाल्याचा त्यांनी इन्कार केला. त्याचवेळी ज्यांनी हिंसक आंदोलन केले, पोलिसांवर हल्ला केला, पोलिसांची वाहने जाळली त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नौदलाचा विरोध नसतानाही आंदोलन नौदलाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विरोध केला नव्हता, तर आपल्या ताब्यात असलेल्या जागेत केवळ भिंत बांधण्यास घेतली होती. त्यामुळे अचानक शेतकऱ्यांनी हिंसक पवित्रा घेण्याचे काहीच कारण नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.