शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
3
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
4
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
5
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
6
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
8
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
9
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
10
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
11
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
12
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
13
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
14
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
15
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
16
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
17
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
18
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
19
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
20
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?

‘जलयुक्त’मधून १४०० कोटी खर्च

By admin | Updated: January 18, 2016 01:01 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती : विकास सोसायट्यांना अनुदान देणार; अंबप सोसायटीचा अमृतमहोत्सव

कोल्हापूर/ नवे पारगाव : दुष्काळावर मात करण्यास साहाय्यभूत ठरणारे ‘जलयुक्त शिवार अभियान’ यावर्र्षी राज्यातील ६५०० गावांमध्ये राबविले असून, यासाठी १४०० कोटींचा खर्च केल्याची माहिती रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली.अंबप (ता. हातकणंगले) येथील अंबप विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे होते. प्रमुख उपस्थिती बेळगावच्या केएलई सोसायटीचे अध्यक्ष खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांची होती. पालकमंत्री पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून गावासाठी लागणारे पिण्याचे आणि शेतीचे पाणी उपलब्ध होत असल्याने या कार्यक्रमावर राज्य शासनाने सर्वार्थांनी भर दिला आहे. या कार्यक्रमातून गावाला लागणाऱ्या पाण्याचे आॅडिट, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब नि थेंब अडविणे, मुरविणे यासह जलसंधारणाचे अन्य उपाय हाती घेण्यात आले आहेत. राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर काही अंशी मात करणे शक्य झाले आहे. दोन-तीन महिन्यांत नियमित दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.ते पुढे म्हणाले, सहकारी चळवळीमुळे महाराष्ट्र आज उभा आहे. ही सहकारी चळवळ टिकली पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. मात्र सहकारातील अपप्रवृत्ती आणि चुकीच्या गोष्टींना अभय दिले जाणार नाही. राज्यात जवळपास २ लाख ३ हजार सहकारी संस्था असून, त्यामधील केवळ कागदोपत्रीच कारभार असणाऱ्या एक लाख संस्था आढळून आल्याने त्या कायदेशीर कारवाईअंती टप्प्याटप्प्याने येत्या मार्चअखेर बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. याप्रसंगी वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे, खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे व्हाइस चेअरमन सुरेश पाटील यांनी स्वागत केले. चेअरमन डॉ. बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. समारंभास हातकणंगले तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. अण्णासाहेब चौगुले, वारणा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रताप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उपस्थित होते.शून्य टक्के व्याज : विकास सोसायट्यांना ३९ हजार कोटींचे कर्जराज्यातील २१ हजार विकास सोसायट्यांना जिल्हा मध्यवर्र्ती बँकांच्या माध्यमातून ३९ हजार कोटींचा कर्जपुरवठा शून्य टक्के व्याजदराने करून शासनाने त्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. विकास सोसायट्यांना दरवर्र्षी त्यांच्या उलाढालीवर आधारित शासनाकडून अनुदान देण्याचा शासन विचार करीत असून, यातून त्यांनी सोसायटीच्या सचिवाची नेमणूक करून कारभार करावा. विकास सोसायट्यांनी कर्ज पुरवठ्यावरच न थांबता भविष्यात नवनवे उपक्रम आणि योजना हाती घेऊन आपली उलाढाल वाढवावी, असा सल्ला पाटील यांनी यावेळी दिला.अंबप विकास सोसायटीची बिनविरोध निवडणूक, १०० टक्के कर्जवसुली, शून्य एनपीए या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.