शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘जलयुक्त’मधून १४०० कोटी खर्च

By admin | Updated: January 18, 2016 01:01 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती : विकास सोसायट्यांना अनुदान देणार; अंबप सोसायटीचा अमृतमहोत्सव

कोल्हापूर/ नवे पारगाव : दुष्काळावर मात करण्यास साहाय्यभूत ठरणारे ‘जलयुक्त शिवार अभियान’ यावर्र्षी राज्यातील ६५०० गावांमध्ये राबविले असून, यासाठी १४०० कोटींचा खर्च केल्याची माहिती रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली.अंबप (ता. हातकणंगले) येथील अंबप विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे होते. प्रमुख उपस्थिती बेळगावच्या केएलई सोसायटीचे अध्यक्ष खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांची होती. पालकमंत्री पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून गावासाठी लागणारे पिण्याचे आणि शेतीचे पाणी उपलब्ध होत असल्याने या कार्यक्रमावर राज्य शासनाने सर्वार्थांनी भर दिला आहे. या कार्यक्रमातून गावाला लागणाऱ्या पाण्याचे आॅडिट, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब नि थेंब अडविणे, मुरविणे यासह जलसंधारणाचे अन्य उपाय हाती घेण्यात आले आहेत. राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर काही अंशी मात करणे शक्य झाले आहे. दोन-तीन महिन्यांत नियमित दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.ते पुढे म्हणाले, सहकारी चळवळीमुळे महाराष्ट्र आज उभा आहे. ही सहकारी चळवळ टिकली पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. मात्र सहकारातील अपप्रवृत्ती आणि चुकीच्या गोष्टींना अभय दिले जाणार नाही. राज्यात जवळपास २ लाख ३ हजार सहकारी संस्था असून, त्यामधील केवळ कागदोपत्रीच कारभार असणाऱ्या एक लाख संस्था आढळून आल्याने त्या कायदेशीर कारवाईअंती टप्प्याटप्प्याने येत्या मार्चअखेर बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. याप्रसंगी वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे, खासदार प्रभाकर कोरे, माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे व्हाइस चेअरमन सुरेश पाटील यांनी स्वागत केले. चेअरमन डॉ. बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. समारंभास हातकणंगले तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. अण्णासाहेब चौगुले, वारणा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रताप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उपस्थित होते.शून्य टक्के व्याज : विकास सोसायट्यांना ३९ हजार कोटींचे कर्जराज्यातील २१ हजार विकास सोसायट्यांना जिल्हा मध्यवर्र्ती बँकांच्या माध्यमातून ३९ हजार कोटींचा कर्जपुरवठा शून्य टक्के व्याजदराने करून शासनाने त्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. विकास सोसायट्यांना दरवर्र्षी त्यांच्या उलाढालीवर आधारित शासनाकडून अनुदान देण्याचा शासन विचार करीत असून, यातून त्यांनी सोसायटीच्या सचिवाची नेमणूक करून कारभार करावा. विकास सोसायट्यांनी कर्ज पुरवठ्यावरच न थांबता भविष्यात नवनवे उपक्रम आणि योजना हाती घेऊन आपली उलाढाल वाढवावी, असा सल्ला पाटील यांनी यावेळी दिला.अंबप विकास सोसायटीची बिनविरोध निवडणूक, १०० टक्के कर्जवसुली, शून्य एनपीए या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.