शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पीडितांच्या कुटुंबीयांना पुनर्वसनाची अपेक्षा

By admin | Updated: November 10, 2016 05:35 IST

बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत

पंढरीनाथ गवळी, भुसावळ (जि. जळगाव)बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत, मात्र शासनाने पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे. गावोगावी भाकरी मागून खाणे आम्ही बंद करु. त्यामुळे आमच्या मुलाबाळांची होणारी आबाळ तरी थांबेल,अशी भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी गेलेल्या हलखेडा (ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) येथील आदिवासी मुलींवर अत्याचार झाला. या प्रकरणाला आठ दिवस झाले. पोलीस व सरकारी अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी गावात येत आहेत. मात्र पीडित कुटुंबांना अजून पुरेशी मदत मिळालेली नाही.गावात अत्याचाराच्या वेदनेचे सावट पसरले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हलखेडा गावात आदिवासींची रोजच्या भाकरीसाठी लढाई सुरूच आहे. त्यात नवे संकट आले आहे. हलखेड्यात दहावी पास झालेली दोन मुले व बारावी झालेली एक मुलगी आहे. बाकी संपूर्ण गाव निरक्षर. मुलींना शिकायला पाठविले तर हे असे विपरित घडल्याची भावना आदिवासींची आहे.घटनेनंतर अनेक कुुटुंबे भटकंतीसाठी रवाना झाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले-मुलीही आहेत. शेती नसल्याने काही जण दुसऱ्याची शेती करतात. यावर्षी कापूस व ज्वारीचे उत्पन्न आले नाही. त्यामुळे रुद्राक्ष माळा विक्रीसाठी आदिवासी पंढरपूर, उज्जैन, अलाहाबाद, जुनागडकडे गेली आहेत.काही कुटुंब गावातच लाहुरी-तितर पकडून संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यात कोठे चोरी झाली, दरोडा पडला, खून झाला तर पोलीस आम्हालाच पकडतात. जबर मारहाण करतात. गुन्हेगारी जमात म्हणतात. हा शिक्का पुसला गेला पाहिजे. हे सर्व केव्हा थांबेल, असा आदिवासींचा सवाल आहे.हलखेडा, लालगोटा ही गावे शंभर टक्के आदिवासींची. या समाजासाठीच्या योजनांची येथे अंमलबजावणी झाली नसल्याचे वास्तव आहे. रस्ते नाही, पाणी लांबून आणावे लागते. सुरक्षेची साधने नाहीत, असे हे आडवळणाचे जंगलातील गाव आहे. पीडित मुलींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती मिळाली. पालकांनी मुलांना खर्चासाठी पाठविलेले पैसे देखील शिक्षक आणि रितूसिंग काढून घ्यायचा. मुलांना दमबाजी करायचा, असेही पालकांनी सांगितले.आश्रम शाळेतील हॉलमध्ये मुले, मुली झोपायचे. तेव्हा दरवाजाला आतून कडी लावू देण्यास शिक्षक आणि रितूसिंग मनाई करायचा. कडी लावली तर मारायचा, असे पालक सांगतात.