शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांच्या कुटुंबीयांना पुनर्वसनाची अपेक्षा

By admin | Updated: November 10, 2016 05:35 IST

बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत

पंढरीनाथ गवळी, भुसावळ (जि. जळगाव)बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत, मात्र शासनाने पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे. गावोगावी भाकरी मागून खाणे आम्ही बंद करु. त्यामुळे आमच्या मुलाबाळांची होणारी आबाळ तरी थांबेल,अशी भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी गेलेल्या हलखेडा (ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) येथील आदिवासी मुलींवर अत्याचार झाला. या प्रकरणाला आठ दिवस झाले. पोलीस व सरकारी अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी गावात येत आहेत. मात्र पीडित कुटुंबांना अजून पुरेशी मदत मिळालेली नाही.गावात अत्याचाराच्या वेदनेचे सावट पसरले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हलखेडा गावात आदिवासींची रोजच्या भाकरीसाठी लढाई सुरूच आहे. त्यात नवे संकट आले आहे. हलखेड्यात दहावी पास झालेली दोन मुले व बारावी झालेली एक मुलगी आहे. बाकी संपूर्ण गाव निरक्षर. मुलींना शिकायला पाठविले तर हे असे विपरित घडल्याची भावना आदिवासींची आहे.घटनेनंतर अनेक कुुटुंबे भटकंतीसाठी रवाना झाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले-मुलीही आहेत. शेती नसल्याने काही जण दुसऱ्याची शेती करतात. यावर्षी कापूस व ज्वारीचे उत्पन्न आले नाही. त्यामुळे रुद्राक्ष माळा विक्रीसाठी आदिवासी पंढरपूर, उज्जैन, अलाहाबाद, जुनागडकडे गेली आहेत.काही कुटुंब गावातच लाहुरी-तितर पकडून संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यात कोठे चोरी झाली, दरोडा पडला, खून झाला तर पोलीस आम्हालाच पकडतात. जबर मारहाण करतात. गुन्हेगारी जमात म्हणतात. हा शिक्का पुसला गेला पाहिजे. हे सर्व केव्हा थांबेल, असा आदिवासींचा सवाल आहे.हलखेडा, लालगोटा ही गावे शंभर टक्के आदिवासींची. या समाजासाठीच्या योजनांची येथे अंमलबजावणी झाली नसल्याचे वास्तव आहे. रस्ते नाही, पाणी लांबून आणावे लागते. सुरक्षेची साधने नाहीत, असे हे आडवळणाचे जंगलातील गाव आहे. पीडित मुलींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती मिळाली. पालकांनी मुलांना खर्चासाठी पाठविलेले पैसे देखील शिक्षक आणि रितूसिंग काढून घ्यायचा. मुलांना दमबाजी करायचा, असेही पालकांनी सांगितले.आश्रम शाळेतील हॉलमध्ये मुले, मुली झोपायचे. तेव्हा दरवाजाला आतून कडी लावू देण्यास शिक्षक आणि रितूसिंग मनाई करायचा. कडी लावली तर मारायचा, असे पालक सांगतात.