शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पीडितांच्या कुटुंबीयांना पुनर्वसनाची अपेक्षा

By admin | Updated: November 10, 2016 05:35 IST

बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत

पंढरीनाथ गवळी, भुसावळ (जि. जळगाव)बुलडाण्यातील आश्रमशाळेतील अत्याचार पीडित पालकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. भटकंतीची सर्व कामे सोडण्यास तयार आहोत, मात्र शासनाने पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे. गावोगावी भाकरी मागून खाणे आम्ही बंद करु. त्यामुळे आमच्या मुलाबाळांची होणारी आबाळ तरी थांबेल,अशी भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी गेलेल्या हलखेडा (ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) येथील आदिवासी मुलींवर अत्याचार झाला. या प्रकरणाला आठ दिवस झाले. पोलीस व सरकारी अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी गावात येत आहेत. मात्र पीडित कुटुंबांना अजून पुरेशी मदत मिळालेली नाही.गावात अत्याचाराच्या वेदनेचे सावट पसरले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हलखेडा गावात आदिवासींची रोजच्या भाकरीसाठी लढाई सुरूच आहे. त्यात नवे संकट आले आहे. हलखेड्यात दहावी पास झालेली दोन मुले व बारावी झालेली एक मुलगी आहे. बाकी संपूर्ण गाव निरक्षर. मुलींना शिकायला पाठविले तर हे असे विपरित घडल्याची भावना आदिवासींची आहे.घटनेनंतर अनेक कुुटुंबे भटकंतीसाठी रवाना झाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले-मुलीही आहेत. शेती नसल्याने काही जण दुसऱ्याची शेती करतात. यावर्षी कापूस व ज्वारीचे उत्पन्न आले नाही. त्यामुळे रुद्राक्ष माळा विक्रीसाठी आदिवासी पंढरपूर, उज्जैन, अलाहाबाद, जुनागडकडे गेली आहेत.काही कुटुंब गावातच लाहुरी-तितर पकडून संसाराचा गाडा ओढत आहेत. त्यात कोठे चोरी झाली, दरोडा पडला, खून झाला तर पोलीस आम्हालाच पकडतात. जबर मारहाण करतात. गुन्हेगारी जमात म्हणतात. हा शिक्का पुसला गेला पाहिजे. हे सर्व केव्हा थांबेल, असा आदिवासींचा सवाल आहे.हलखेडा, लालगोटा ही गावे शंभर टक्के आदिवासींची. या समाजासाठीच्या योजनांची येथे अंमलबजावणी झाली नसल्याचे वास्तव आहे. रस्ते नाही, पाणी लांबून आणावे लागते. सुरक्षेची साधने नाहीत, असे हे आडवळणाचे जंगलातील गाव आहे. पीडित मुलींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती मिळाली. पालकांनी मुलांना खर्चासाठी पाठविलेले पैसे देखील शिक्षक आणि रितूसिंग काढून घ्यायचा. मुलांना दमबाजी करायचा, असेही पालकांनी सांगितले.आश्रम शाळेतील हॉलमध्ये मुले, मुली झोपायचे. तेव्हा दरवाजाला आतून कडी लावू देण्यास शिक्षक आणि रितूसिंग मनाई करायचा. कडी लावली तर मारायचा, असे पालक सांगतात.