शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला ‘पॅकेज’ची अपेक्षा

By admin | Updated: September 1, 2015 01:59 IST

तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे

विकास राऊत, औरंगाबादतीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ सप्टेंबरपासून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील पीक-पाण्याचा आढावा घेणार आहेत. दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे. पाऊसच नसल्याने विभागात खरीप हंगाम वाया गेला. लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांना सर्वाधिक फटकाबसला. उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता जळालेले पीक पाहण्यावाचून काहीच उरलेले नाही. त्यातचकर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.मराठवाड्यातील एकूण ४३ लाख ९४० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२ लाख ५३८ हेक्टरवर (७५ टक्के) खरीप पेरणी झाली. मात्र पावसाअभावी पेरणी वाया गेली. विभागात आजवर केवळ ३२ टक्के पाऊस झाला.भर पावसाळ्यातच मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला आहे. एक हजार गावे टंचाईग्रस्त झाली असून, १ हजार ३०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील ७ जिल्ह्यांमधील चारा छावण्यांसाठी आगामी तीन महिन्यांसाठी ३०० कोटींचा निधी लागेल. पशुधन वाचविण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात प्राधान्याने छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांतील पशुधनासाठी रोज तीन ते सव्वातीन कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल प्रशासनाने केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील स्थितीचा आॅगस्टमध्ये आढावा घेतला. केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंग यांनी आॅगस्टच्या मध्यास विभागाचा धावता दौरा केला. त्यानंतर २३ व २४ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. त्यात मराठवाड्याचा अनुशेषही गाजला.