शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

तूर खरेदीला मुदतवाढ; केंद्राची परवानगी

By admin | Updated: May 9, 2017 02:31 IST

राज्यात अतिरिक्त एक लाख टन तुरीची ३१ मेपर्यंत नाफेडमार्फत खरेदी करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात अतिरिक्त एक लाख टन तुरीची ३१ मेपर्यंत नाफेडमार्फत खरेदी करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली, तसेच ही खरेदी झाल्यानंतर परिस्थिती पाहून आणखी एक लाख टन तुरीची खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.राज्यातील तुरीचे विक्रमी उत्पादन पाहता, तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे अतिरिक्त दोन लाख टन तूर खरेदीसाठी परवानगी मागितली होती. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानुसार, अतिरिक्त एक लाख टन तुरीची खरेदी नाफेडमार्फत करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच ही खरेदी झाल्यानंतर परिस्थिती बघून आणखी एक लाख टन तुरीची खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.मागील सरकारच्या काळात जेव्हा १३ लाख टन उत्पादन झाले होते, तेव्हा केवळ २० हजार टन तुरीची खरेदी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षात २० लाख टनाहून अधिक उत्पादन झाले असताना, राज्य सरकारने केलेली आजपर्यंतची विक्रमी खरेदी आहे. ही खरेदी ६ लाख टनावर जाण्याची शक्यता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.