शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:46 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नवरात्र उत्सवानंतर होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे दिले असले तरी विस्ताराला दिवाळीनंतरच मुहूर्त लागेल, असे सूत्रांनी सांगितले. विस्तार लांबणीवर पडल्याने विद्यमान मंत्र्यांना दिवाळी गोड लागणार असून इच्छिुकांची प्रतीक्षा वाढणार आहे.

यदु जोशी।मुंबई/ औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नवरात्र उत्सवानंतर होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे दिले असले तरी विस्ताराला दिवाळीनंतरच मुहूर्त लागेल, असे सूत्रांनी सांगितले. विस्तार लांबणीवर पडल्याने विद्यमान मंत्र्यांना दिवाळी गोड लागणार असून इच्छिुकांची प्रतीक्षा वाढणार आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस रविवारी औरंगाबादेत होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी छेडले असता, ‘नवरात्रीनंतर विस्तार करू’, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. मात्र, मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, कोणाला वगळणार, यावर त्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे नवरात्रीनंतर म्हणजे नेमके कधी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सूत्रांनी सांगितले की, चालू महिन्याअखेर मुख्यमंत्री विदेश दौºयावर जात आहेत. हे सरकार येत्या ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण करीत आहे. या त्रिवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. सरकारची कामगिरी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची तयारी सुरू आहे. एकीकडे ही तयारी आणि दुसरीकडे दिवाळीच्या उत्सवी वातावरणात विस्तार होईल का, याबाबत साशंकता आहे. विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.>खडसेंच्या वापसीचे काय?एकनाथ खडसे यांच्या वापसीबाबत अनिश्चितता आहे. पुण्यातील भूखंड प्रकरणी त्यांची चौकशी करणाºया न्या. झोटिंग समितीचा अहवाल शासनाला सादर झालेला असला तरी तो विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सादर करावा लागेल. हे अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. अहवालातील निष्कर्ष, त्यावरील मुख्यमंत्र्यांची भूमिका यावरच खडसेंचे परतणे अवलंबून असेल.>शिवसेनेतही खांदेपालटमंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर शिवसेनेच्या मंत्र्यांचा खांदेपालट होऊ शकतो. विद्यमान तीन कॅबिनेट मंत्र्यांबाबत शिवसेना आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यावर ‘सबुरीने घ्या, मी योग्य वेळी निर्णय घेईन’, असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. कदाचित ते विस्ताराची वाट पाहत असावेत, अशी सेनेत चर्चा आहे.>राणेंचा समावेश होणार?दसºयापूर्वी आपण सीमोल्लंघन करणार असल्याचे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. राणे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि कालिदास कोळंबकर हे दोन आमदारही भाजपामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे खडसे यांच्या जागी राणे यांना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेना व काँग्रेसला सुरुंग लावण्याची खेळी केली जाऊ शकते. मात्र, भाजपामधून या शक्यतेला दुजोरा मिळाला नाही.मंत्रिमंडळाचा आकार वाढणारसध्या मंत्रिमंडळात २३ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री, असे ३९ मंत्री आहेत. शिवाय, पंकजा मुंडे व विद्या ठाकूर अशा दोनच महिला मंत्री आहेत.संभाव्य विस्तारात आणखी एखाद्या महिला आमदाराचा नंबर लागू शकतो. विद्यमान मंत्र्यांपैकी भाजपाच्या २ कॅबिनेट, ३ राज्यमंत्र्यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज असल्याचे समजते.काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक महत्त्वाची खाती असल्याने त्यांनाही प्रभावी कामगिरी दाखवता आलेली नाही. त्यामुळे तो अतिरिक्त पदभार काढून घेतला जाऊ शकतो.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस