शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

महाआघाडीचा महागोंधळ

By admin | Updated: February 4, 2017 02:45 IST

भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या

मुंबई : भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या रिपाइंने तब्बल ९० वॉर्डांमध्ये अर्ज भरल्याने उद्या माघारीची कसरत भाजपाला करावी लागणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, रासपचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महायुतीची घोषणा करण्यात आली. ‘ज्यांच्यासोबत रिपाइं जातो त्यांची सत्ता येते, असे सांगून आठवले म्हणाले की, आम्ही भाजपाकडे अधिक जागा मागितल्या होत्या. ४० ते ४५ जागा मिळण्याची अपेक्षा होती. पण फार जागा मागून भाजपाची अडचण करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांसाठी चर्चेतून हा निर्णय घेतला. महादेव जानकर म्हणाले की, भाजपाने आमच्या पक्षाला ६ जागा दिल्या, ती खूश आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालय स्थापण्याची घोषणा करून ओबीसींना न्याय दिला आहे. भाजपा मित्र पक्षांचा मानसन्मान राखत आहे. आमच्या पक्षाला महायुतीमध्ये ४ जागा मिळाल्या. आम्ही समाधानी आहोत पण संतुष्ट नाही. निदान रासपाइतक्या म्हणजे ६ जागा तरी मिळायला हव्या होत्या, असे शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)रिपाइंला उपमहापौरपद- भाजपाच्या नेतृत्वातील महाआघाडीचीच सत्ता येईल आणि त्यावेळी उपमहापौरपद व महत्त्वाच्या एका समितीचे अध्यक्षपद हे रिपाइंला देण्यात येईल. तसेच, इतर मित्रपक्षांनादेखील सन्मानाचे स्थान दिले जाईल, असे खा.रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे यांनी जाहीर केले.शिवसंग्राम कमळावरशिवसंग्रामचे चार उमेदवार हे कमळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. रिपाइंचे काही उमेदवारदेखील भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत. वॉर्डातील राजकीय परिस्थिती बघून तसे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महायुतीमध्ये भाजपा १९२ रिपाइं २५, रासप ६ तर शिवसंग्राम ४ जागा लढणार आहे असे जाहीर करण्यात आले मात्र, रिपाइंला आणखी चार जागा देण्याचा विचार केला जाईल, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. रिपाइंला दिलेल्या २५ जागांपैकी पाच ते सात जागांवर भाजपानेही उमेदवार दिले आहेत. भाजपाकडे असलेल्या अनेक जागांवर रिपाइंच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. ठरवून दिलेल्या जागांवरच दोघांचे उमेदवार लढतील आणि इतर माघार घेतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.