शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

महाआघाडीचा महागोंधळ

By admin | Updated: February 4, 2017 02:45 IST

भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या

मुंबई : भारतीय जनता पार्टीने आज रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला सोबत घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोट बांधली. मात्र, २५ जागा मिळालेल्या रिपाइंने तब्बल ९० वॉर्डांमध्ये अर्ज भरल्याने उद्या माघारीची कसरत भाजपाला करावी लागणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, रासपचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महायुतीची घोषणा करण्यात आली. ‘ज्यांच्यासोबत रिपाइं जातो त्यांची सत्ता येते, असे सांगून आठवले म्हणाले की, आम्ही भाजपाकडे अधिक जागा मागितल्या होत्या. ४० ते ४५ जागा मिळण्याची अपेक्षा होती. पण फार जागा मागून भाजपाची अडचण करू नये, अशी भूमिका आम्ही घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांसाठी चर्चेतून हा निर्णय घेतला. महादेव जानकर म्हणाले की, भाजपाने आमच्या पक्षाला ६ जागा दिल्या, ती खूश आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालय स्थापण्याची घोषणा करून ओबीसींना न्याय दिला आहे. भाजपा मित्र पक्षांचा मानसन्मान राखत आहे. आमच्या पक्षाला महायुतीमध्ये ४ जागा मिळाल्या. आम्ही समाधानी आहोत पण संतुष्ट नाही. निदान रासपाइतक्या म्हणजे ६ जागा तरी मिळायला हव्या होत्या, असे शिवसंग्रामचे विक्रांत आंबरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)रिपाइंला उपमहापौरपद- भाजपाच्या नेतृत्वातील महाआघाडीचीच सत्ता येईल आणि त्यावेळी उपमहापौरपद व महत्त्वाच्या एका समितीचे अध्यक्षपद हे रिपाइंला देण्यात येईल. तसेच, इतर मित्रपक्षांनादेखील सन्मानाचे स्थान दिले जाईल, असे खा.रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे यांनी जाहीर केले.शिवसंग्राम कमळावरशिवसंग्रामचे चार उमेदवार हे कमळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. रिपाइंचे काही उमेदवारदेखील भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत. वॉर्डातील राजकीय परिस्थिती बघून तसे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महायुतीमध्ये भाजपा १९२ रिपाइं २५, रासप ६ तर शिवसंग्राम ४ जागा लढणार आहे असे जाहीर करण्यात आले मात्र, रिपाइंला आणखी चार जागा देण्याचा विचार केला जाईल, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. रिपाइंला दिलेल्या २५ जागांपैकी पाच ते सात जागांवर भाजपानेही उमेदवार दिले आहेत. भाजपाकडे असलेल्या अनेक जागांवर रिपाइंच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. ठरवून दिलेल्या जागांवरच दोघांचे उमेदवार लढतील आणि इतर माघार घेतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.