शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचाही प्रश्न

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ : दूरगामी परिणाम घडविणारी लढत

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ-तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे, मात्र महायुतीतील भाजप-सेनेचा वाद न मिटल्याने, तिकीट कोणाला मिळणार याबाबत संभ्रमावस्था आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून, उमेदवारी आपल्यालाच आहे, असे सांगत प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याने आघाडीचे कार्यकर्तेही प्रचाराचे रान उठवत आहेत. ही निवडणूक मतदारसंघात दूरगामी राजकीय परिणाम करणारी ठरणार असून, घोरपडे अस्तित्व टिकविण्यासाठी लढतील, तर गृहमंत्री पाटील प्रतिष्ठा टिकविण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.कवठेमहांकाळ तालुक्यात नवी राजकीय समीकरणे तयार होत असून, घोरपडे यांना भाजपच्या माध्यमातून उतरवून निवडून आणायचे, असा चंग खासदार संजयकाका पाटील यांनी बांधला आहे, तर गृहमंत्री पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विजय सगरे यांनी ताकत उभी केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात मोदी लाटेमुळे भाजपला फायदा झाला. मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसअंतर्गत वादाचाही मोठा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसला. दुहीचा अनुभव घेतल्याने गृहमंत्री पाटील यांनी या महिन्यात मतदारसंघात आघाडीतील बिघाडी नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्यायला लावून कार्यकर्त्यांना गट-तट विसरून कामाला लावले आहे. महिलांच्या संघटनासाठी माजी सभापती सुरेखा कोळेकर, सभापती वैशाली पाटील, कल्पना घागरे, उषाताई माने, माजी महिला बालकल्याण सभापती राधाताई हाक्के, बबुताई वाघमारे यांना तालुक्यात व्यूहरचना करण्यास सांगितले आहे. महायुती तुटल्याने शिवसेनेचे जयसिंगराव शेंडगे हेही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ही निवडणूक घोरपडे यांच्या अस्तित्वाची, तर गृहमंत्री पाटील यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे.आधीच दिला शहनुकत्याच झालेल्या महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय सगरे व गृहमंत्री पाटील गटाच्या पॅनेलने महायुतीचा धुव्वा उडवला. त्याद्वारे महायुतीचे संभाव्य उमेदवार अजितराव घोरपडे यांना निवडणुकीआधीच गहमंत्री पाटील यांनी शह दिल्याचे बोलले जाते.