शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ : शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 24, 2016 18:05 IST

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर आंबोलीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद जाधव (सावंतवाडी)
आंबोली (जि.सिंधुदुर्ग), दि. २४ - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर आज आंबोली येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सकाळी शहीद पांडुरंग गावडे यांचे पार्थिव गोव्यातून आंबोली येथे आणण्यात आले. महाराष्ट्राच्या या शूरपुत्राच्या सन्मानासाठी हजारो गावकरी उपस्थित असून या वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, बिगेडियर प्रविण शिंदे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी आंबोलीत दाखल झाले आहेत. 
श्रीनगर-कुपवाडातील चकड्रगमुल्ला या गावी शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आंबोली-मुळवंदवाडी येथील पांडुरंग महादेव गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. शनिवारी दहशतवाद्यांसोबत तब्बल नऊ तासांपर्यंत चकमक चालली. या चकमकीत भारतीय जवानांनी सर्व पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे गावडे व ४७ रायफल्सचे जवान अतुल कुमार हे जखमी झाले. उपचारावेळी गावडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

गावडे कुटुंबात सैनिकी परंपरा
पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते. देशभर सेवा बजावताना त्यांनी विविध क्षेत्रात चमक दाखविली. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते. तसेच त्यांना रेडिओ ऑपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. कुपवाडामध्ये अतिरेक्यांबरोबर सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीत जवानांनी घरात लपलेल्या पाचही अतिरेक्यांचा खातमा केला. मात्र अतिरेक्यांची गोळी वर्मी लागल्याने गावडे शहीद झाले.
गावडे कुटुंबाला सैनिकी परंपरा आहे. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊही सैन्यातच आहेत. त्यापैकी गणपत हे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक धुळे येथे एनसीसीमधून सैन्यात कार्यरत आहेत. शहीद पांडुरंग फेबु्रवारीमध्ये एका महिन्याच्या रजेवर आले होते. यावेळी त्यांनी मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर धाकट्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. हा त्यांच्या कुटुंबासाठी अखेरचा क्षण ठरला.