शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

EXCLUSIVE : नाशिक पालिकेेच्या बेइज्जतीची पहिली घंटा !

By admin | Updated: January 19, 2017 21:49 IST

समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कालिदासचा जीर्णोद्धार कधी होणार? असा प्रश्न आता राज्यभरातील रंगकर्मींना पडला आहे.

संजय पाठक / ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 19 - सांस्कृतिक नाशिकचा मानबिंदू ठरलेल्या नाशिक महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराची रया गेली असून, समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कालिदासचा जीर्णोद्धार कधी होणार? असा प्रश्न आता राज्यभरातील रंगकर्मींना पडला आहे. बुधवारी रात्री कालिदासच्या दुरवस्थेने त्रस्त झालेल्या नाट्यअभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरच या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची छायाचित्रे टाकून महापालिकेची इभ्रतच वेशीला टांगली आहे. आता तरी त्याची दखल घेऊन सत्ताधिकारी आणि प्रशासन कार्यवाही करणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेचे महाकवी कालिदास हे एकमेव एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह आहे, परंतु त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने त्याची रया गेली आहे. नाट्यप्रेमी आणि कलावंतांनी वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते. परंतू गेल्या काही वर्षांत वातानुकूलन संयत्र बंद असणे, खुर्च्यांची दुरवस्था, पडदा व्यवस्थित न सरकणे असे अनेक विषय चर्चेला आले असून, कालिदासला पूर्णत: सुस्थितीत आणण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे.

 
बुधवारी (दि.१८) रात्री प्रशांत दामले यांची भूमिका ‘साखर खालेल्ला माणूस’ हे नाटक होते. त्यावेळी या नाट्यगृहाचे दारिद्र्य दर्शन घडले. त्यावेळी दामले यांनी ही छायाचित्रे काढून व्हॉट्सअ‍ॅपचे विविध ग्रुप आणि फेसबुकवर शेअर केले. ‘नाशिक महानगरपालिकेच्या  महाकवी कालिदास कलामंदिराच्या नाट्यगृहातील भीषण वास्तव, कसे प्रयोग करणार, कसे येणार रसिक, कसं रंगणार नाटक, ‘गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही हीच अवस्था’ असे त्याखाली नमूद केले असून, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.  महाकवी कालिदासमधील बेसिनची दुरवस्था, अस्वच्छता, प्रसाधनगृहातील घाण, तुटक्या खुर्च्या ही अवस्था त्यातून व्यक्त झाली आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे प्रशांत दामले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या नाट्यगृहात मुळात नाटक या विषयाचा जाणकार व्यवस्थापक असायला हवा, परंतु तो नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेने किमान देखभाल दुरुस्ती केली पाहिजे, परंतू ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले.
 
महापालिकेच्या कालिदास नाट्य मंदिराच्या दुरूस्तीसंदर्भात मी स्वत: महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते, परंतु त्याचा उपयोग झालेला नाही. कालिदास नाट्यगृहाला पूर्णवेळ व्यवस्थापक नसतो, असेल तर त्याला नाटकासाठी काय आवश्यक आहे याची माहिती नसते. साफसफाईसाठी कर्मचारी नसतात, त्यामुळे किमान आउटसोर्सिंग केले पाहिजे, तेही होत नाही. स्पीकर्स पूर्णत: नादुरुस्त असून, ते फाटले आहेत. परंतु त्याचीही निगा होत नाही. या समस्यांबाबत कोणाचे उत्तरदायित्वच नाही, अशी अवस्था आहे. महत्त्वाचे म्हणजे शनिवार आणि रविवार नाट्यगृह केवळ नाटकांसाठी असले पाहिजे, परंतु तसे होत नाही आणि नाटकाशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी कालिदास भाड्याने दिले जाते. त्यालाही मज्जाव केला पाहिजे. खूप प्रयत्न करूनही कालिदासमध्ये सुधारणा होत नाही, त्याचा नाट्यकर्मी आणि रसिकांनाही त्रास होतो. - प्रशांत दामले, नाट्यअभिनेता.