शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘जात प्रमाणपत्रातील जाचक अटी काढणार’

By admin | Updated: April 22, 2015 04:13 IST

जात प्रमाणपत्र मिळवण्यात अडचण ठरणाऱ्या १९५० सालच्या वास्तव्याच्या अटीवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जात प्रमाणपत्र मिळवण्यात अडचण ठरणाऱ्या १९५० सालच्या वास्तव्याच्या अटीवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. महालक्ष्मी येथे मंगळवारी पार पडलेल्या मुंबई मेघपाल पंचायतीच्या सामूहिक विवाह संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते.फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जात प्रमाणपत्र मिळवताना १९५० सालच्या वास्तव्याच्या अटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अ‍ॅटर्नी जनरलचे मत घेऊन त्यातून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या वेळी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचेही त्यांनी कौतुक केले. समूह लग्नसोहळ्यामुळे समाजात समता आणि समरसता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने पंतप्रधानांकडे मागणी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार शंभूप्रसाद महाराजांसह अनेक साधु-संत आणि आमदार मंगल प्रभात लोढा व सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)