शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

वसई पूर्वेतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: August 1, 2016 03:12 IST

एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे.

वसई : वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. एमएमआरडीने कोट्यावधी रुपये खर्च करुन या रस्त्याचे रुंदीकरण केले. परंतू सध्या रस्त्यावर खाजगी ट्रान्सपोर्ट, कार शो रुम मालकांकडून आपली वाहने उभी करण्यासाठी रस्त्याचा वापर केला जात असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या मुख्य रस्त्यावर चोवीस तास वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व पुढे मुंबईकडे जाण्यासाठी वसईकरांना याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. यावेळी रस्तारुंदीकरणात ग्रामस्थांची जुनी घरे तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली दुकाने तोडण्यात आली. जनहिताचेकाम होत असल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध न करता सहकार्य केले. परंतु आता रस्तारुंदीकरणाचा फायदा वाहनचालकांना, स्थानिकांना कमी व व्यापाऱ्यांंनाच जास्त होत आहे. या रस्त्याच्या बाजुला असलेले कार विक्रेते त्यांच्या नवीन व जुन्या गाड्या मुख्य रस्त्यावर पार्किंग करु लागले आहेत. अनेक गॅरेजनी रस्त्यावर धंदा थाटला आहे. तर काही ट्रान्सपोर्ट चालकांकडून या रस्त्याचा आपल्या बसेस उभ्या करण्यासाठी दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीचा चक्का जाम होत असून वाहन चालकांचा वेळ व इंधनाच वाया जात आहे. (प्रतिनिधी)>स्थानिक संतप्त अवैध पार्र्किं ग न रोखल्यास होऊ शकते दुर्घटनावसई पूर्वेतील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची घरे, जमिनी व दुकान ेगेली आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेचे दुर्लक्ष व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे. मुख्य रस्त्यावर केल्या जात असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. महापालिकेने या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध न घातल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे शिवसेना उपविभागप्रमुख नरेंद्र भोईर यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. पालिकेने कारवाई न केल्यास मात्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.