शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वसई पूर्वेतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: August 1, 2016 03:12 IST

एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे.

वसई : वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटी ते रेंजआॅफिस दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. एमएमआरडीने कोट्यावधी रुपये खर्च करुन या रस्त्याचे रुंदीकरण केले. परंतू सध्या रस्त्यावर खाजगी ट्रान्सपोर्ट, कार शो रुम मालकांकडून आपली वाहने उभी करण्यासाठी रस्त्याचा वापर केला जात असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या मुख्य रस्त्यावर चोवीस तास वाहनांची मोठी वर्दळ असते. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व पुढे मुंबईकडे जाण्यासाठी वसईकरांना याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. यावेळी रस्तारुंदीकरणात ग्रामस्थांची जुनी घरे तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली दुकाने तोडण्यात आली. जनहिताचेकाम होत असल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध न करता सहकार्य केले. परंतु आता रस्तारुंदीकरणाचा फायदा वाहनचालकांना, स्थानिकांना कमी व व्यापाऱ्यांंनाच जास्त होत आहे. या रस्त्याच्या बाजुला असलेले कार विक्रेते त्यांच्या नवीन व जुन्या गाड्या मुख्य रस्त्यावर पार्किंग करु लागले आहेत. अनेक गॅरेजनी रस्त्यावर धंदा थाटला आहे. तर काही ट्रान्सपोर्ट चालकांकडून या रस्त्याचा आपल्या बसेस उभ्या करण्यासाठी दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. परिणामी सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीचा चक्का जाम होत असून वाहन चालकांचा वेळ व इंधनाच वाया जात आहे. (प्रतिनिधी)>स्थानिक संतप्त अवैध पार्र्किं ग न रोखल्यास होऊ शकते दुर्घटनावसई पूर्वेतील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची घरे, जमिनी व दुकान ेगेली आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेचे दुर्लक्ष व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे. मुख्य रस्त्यावर केल्या जात असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. महापालिकेने या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध न घातल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे शिवसेना उपविभागप्रमुख नरेंद्र भोईर यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. पालिकेने कारवाई न केल्यास मात्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.