शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

विदर्भ-मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय

By admin | Updated: March 14, 2015 05:10 IST

विदर्भ व मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ठरविताना केळकर समितीने केवळ शहरी भागांचा विचार केला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबाबत

सुधीर लंके, पुणेविदर्भ व मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ठरविताना केळकर समितीने केवळ शहरी भागांचा विचार केला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबाबत आकस ठेऊनच हा अहवाल बनलेला दिसतो, असा आक्षेप उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाने घेतला आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठीही जलसंधारण तसेच दुग्ध विकासासाठी धोरणे आखण्याची गरज महामंडळाने राज्यपालांना पाठविलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी महामंडळाचे मावळते अध्यक्ष मदन पाटील, सदस्य सचिव प्रदीप व्यास, सदस्य पोपटराव पवार, बुधाजीराव मुळीक, विजय आहेर, सुभाष खेमनर, बु.का. लोखंडे यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच बैठक झाली. या वेळी महामंडळाने समितीच्या अहवालावर अनेक आक्षेप घेतले. शहरांतील दरडोई उत्पन्न गृहीत धरल्याने उर्वरित महाराष्ट्र सधन वाटतो. त्यामुळे शहरांऐवजी तालुका हा घटक विचारात घेऊन नियोजन व्हावे, अशी मुख्य सूचना या वेळी करण्यात आली. विदर्भात मालगुजारी तलाव व खारजमिनींचा पट्टा सुधारण्यासाठी तरतूद दाखविण्यात आली आहे. विदर्भाप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रातही १९७२ च्या दुष्काळात बांधलेले पाझर तलाव आहेत. त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. उर्वरित महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर अवर्षणप्रवण भाग असून तेथे ओढ्यांतील पाणलोटासोबतच डोंगरमाथ्यांवर ही कामे करण्याची गरज आहे. औद्योगिकीकरणामुळे या भागातील नद्या प्रदूषित व मृत झाल्या आहेत. समुद्र दूषित झाल्याने मच्छिमारही अडचणीत आले आहेत. याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे. कालव्यांसोबतच धरणांतून बंद नळाने पाणी पुरवठा करण्याचे धोरण घ्यावे लागेल. पश्चिमेत वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे लागेल, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.