शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

विदर्भ-मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय

By admin | Updated: March 14, 2015 05:10 IST

विदर्भ व मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ठरविताना केळकर समितीने केवळ शहरी भागांचा विचार केला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबाबत

सुधीर लंके, पुणेविदर्भ व मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ठरविताना केळकर समितीने केवळ शहरी भागांचा विचार केला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबाबत आकस ठेऊनच हा अहवाल बनलेला दिसतो, असा आक्षेप उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाने घेतला आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठीही जलसंधारण तसेच दुग्ध विकासासाठी धोरणे आखण्याची गरज महामंडळाने राज्यपालांना पाठविलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी महामंडळाचे मावळते अध्यक्ष मदन पाटील, सदस्य सचिव प्रदीप व्यास, सदस्य पोपटराव पवार, बुधाजीराव मुळीक, विजय आहेर, सुभाष खेमनर, बु.का. लोखंडे यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच बैठक झाली. या वेळी महामंडळाने समितीच्या अहवालावर अनेक आक्षेप घेतले. शहरांतील दरडोई उत्पन्न गृहीत धरल्याने उर्वरित महाराष्ट्र सधन वाटतो. त्यामुळे शहरांऐवजी तालुका हा घटक विचारात घेऊन नियोजन व्हावे, अशी मुख्य सूचना या वेळी करण्यात आली. विदर्भात मालगुजारी तलाव व खारजमिनींचा पट्टा सुधारण्यासाठी तरतूद दाखविण्यात आली आहे. विदर्भाप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रातही १९७२ च्या दुष्काळात बांधलेले पाझर तलाव आहेत. त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. उर्वरित महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर अवर्षणप्रवण भाग असून तेथे ओढ्यांतील पाणलोटासोबतच डोंगरमाथ्यांवर ही कामे करण्याची गरज आहे. औद्योगिकीकरणामुळे या भागातील नद्या प्रदूषित व मृत झाल्या आहेत. समुद्र दूषित झाल्याने मच्छिमारही अडचणीत आले आहेत. याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे. कालव्यांसोबतच धरणांतून बंद नळाने पाणी पुरवठा करण्याचे धोरण घ्यावे लागेल. पश्चिमेत वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे लागेल, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.