शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही; ईव्हीएम बिघाडाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 11:08 IST

महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत.

मुंबई : राज्यात 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणाहून मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी तास दीड तासापासून मतदाराला रांगेत खोळंबून राहावे लागल्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे. 

महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत. परभणीतील पालम तालुक्यात आरखेड येथे मशीन बिघाडामुळे एक तासा पासून मतदान बंद होते. पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेवरील मतदान यंत्र बंद पडले. शहरातील मतदान केंद्र क्रमांक 215 व 235 वरील मतदान यंत्र बंद पडल्याने नवीन यंत्र बसविण्यात आले. या ठिकाणी जवळपास अर्धा तास मतदार खोळंबळे होते. मानवत तालुक्यातील सावरगाव येथील मतदान केंद्रावरील एक मशीन अर्धा तासापासून बंद होते.

 

 तर अकोल्यातील व्याळा बुथ क्र. 123 वर मशीन बंद पडल्याने 1 तास उशिराने मतदान सुरू झाले. शिरलायेथेही मतदान यंत्र बंद पडले होते.

 

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील मतदान यंत्र सकाळपासून बंद मतदार रांगेतच होते. सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदान यंत्रात बिघाडचा घोळ कायम होता. बऱ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रभाग क्रमांक सात मधील सोलापूर महानगरपालिका उर्दू मुलींची शाळा क्रमांक 2 येथील दोन मशीन बंद होती. तर नीलम नगर जिल्हा परिषद शाळा ( प्रभाग 19) येथे देखील एक मशीन बंद पडली होती. अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे असलेल्या बूथ क्रमांक 274 मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला होता. 

 

ईव्हीएमच चुकीच्या गावात गेलेअक्कलकोटयेथील बोरगाव येथे बूथ क्रमांक २ वरील मशीन दुसऱ्या गावी गेल्याने मतदानास उशीर झाला. मतदानाची वेळ सुरु होईनही ४५ मिनिट झाली तरीही मशीन आली नव्हती. मतदार ताटकळत थांबले होते. ईव्हीएम बंद पडण्याचा घोळ महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांमध्ये सुरु होता. 

 

भिंगारा येथील मतदान केंद्रावर शून्य टक्के मतदान

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासात शून्य टक्के मतदान, पायाभूत सुविधांसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019solapur-pcसोलापूरparbhani-pcपरभणीakola-pcअकोला