शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएममध्ये घोळ शक्यच नाही!

By admin | Updated: March 7, 2017 04:25 IST

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही.

नागपूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही. पराभूत झालेल्या उमेदवारांकडून याबाबतचा आरोप करण्यात येत असला तरी हा विषय भाजपाचा नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या दानवे यांनी सोमवारी लोकमत भवन येथे सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय सहकाऱ्यांशी राज्यातील निवडणूक निकालावर चर्चा केली. यापूर्वी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रावसाहेब दानवे व खासदार कपिल पाटील यांचे स्वागत केले. भाजपाचे संघटन व राज्य सरकार यात कुठलेच मतभेद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार्टीचा चेहरा बनले आहे, असे सांगून दानवे म्हणाले, मुंबईत पक्षाला सर्वच समाजाची मते मिळाली आहेत. इतकेच नाही तर भाजपाने मुंबईत शिवसेनेच्या मराठी ‘व्होट बँके’ला सुरुंग लावला. परळीतील पराभवानंतर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दानवे म्हणाले की, पक्ष त्यांच्यासोबत आहे. या पराभवावर मंथन केले जाईल. तिथे कोण कुठे कमी पडले, यावर बैठकीत सविस्तर चर्चाही होईल. (प्रतिनिधी)>शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाहीमुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजपाने शिवसेनेला वॉकओव्हर देण्याचा घेतलेल्या निर्णयावर दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद नाही. काही बाबतीत त्यांची भूमिका वेगळी आहे. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे एकच मत आहे.एकमेकांविरुद्ध निवडणुका लढल्यानंतर परत एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेनेने जेव्हा भाजपाला आपली ताकद वाढल्याचा हवाला दिला तेव्हा हिंगोली, बुलडाणा, रामटेक, ठाणे या लोकसभेच्या जागा भाजपाने सोडून दिल्या.परंतु भाजपाची ताकद वाढली तेव्हा शिवसेना जागा सोडण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीमुळे दोन्ही पक्षांना एकमेकांना ताकद दाखविण्यासाठी विरोधात निवडणुका लढवाव्या लागल्या.>विरोधकांनी कार्यकर्त्यांना दूर केलेकाँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी कार्यकर्त्यांना दूर लोटले. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षामध्ये असंतोष दिसून आला. त्याचा फायदा भाजपाला मिळाला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.