शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

ईव्हीएममध्ये घोळ शक्यच नाही!

By admin | Updated: March 7, 2017 04:25 IST

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही.

नागपूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही. पराभूत झालेल्या उमेदवारांकडून याबाबतचा आरोप करण्यात येत असला तरी हा विषय भाजपाचा नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या दानवे यांनी सोमवारी लोकमत भवन येथे सदिच्छा भेट दिली आणि संपादकीय सहकाऱ्यांशी राज्यातील निवडणूक निकालावर चर्चा केली. यापूर्वी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रावसाहेब दानवे व खासदार कपिल पाटील यांचे स्वागत केले. भाजपाचे संघटन व राज्य सरकार यात कुठलेच मतभेद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार्टीचा चेहरा बनले आहे, असे सांगून दानवे म्हणाले, मुंबईत पक्षाला सर्वच समाजाची मते मिळाली आहेत. इतकेच नाही तर भाजपाने मुंबईत शिवसेनेच्या मराठी ‘व्होट बँके’ला सुरुंग लावला. परळीतील पराभवानंतर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दानवे म्हणाले की, पक्ष त्यांच्यासोबत आहे. या पराभवावर मंथन केले जाईल. तिथे कोण कुठे कमी पडले, यावर बैठकीत सविस्तर चर्चाही होईल. (प्रतिनिधी)>शिवसेनेशी वैचारिक मतभेद नाहीमुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजपाने शिवसेनेला वॉकओव्हर देण्याचा घेतलेल्या निर्णयावर दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद नाही. काही बाबतीत त्यांची भूमिका वेगळी आहे. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे एकच मत आहे.एकमेकांविरुद्ध निवडणुका लढल्यानंतर परत एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेनेने जेव्हा भाजपाला आपली ताकद वाढल्याचा हवाला दिला तेव्हा हिंगोली, बुलडाणा, रामटेक, ठाणे या लोकसभेच्या जागा भाजपाने सोडून दिल्या.परंतु भाजपाची ताकद वाढली तेव्हा शिवसेना जागा सोडण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीमुळे दोन्ही पक्षांना एकमेकांना ताकद दाखविण्यासाठी विरोधात निवडणुका लढवाव्या लागल्या.>विरोधकांनी कार्यकर्त्यांना दूर केलेकाँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी कार्यकर्त्यांना दूर लोटले. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षामध्ये असंतोष दिसून आला. त्याचा फायदा भाजपाला मिळाला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.