शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

राज्यामध्ये सर्वत्र चक्काजाम

By admin | Updated: February 1, 2017 05:44 IST

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या बॅनरखाली मंगळवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. औरंगाबाद व नांदेड येथे झालेला लाठीमार, सेनगावला झालेली दगडफेक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटना वगळता, अन्यत्र आंदोलन शांततेत व शिस्तीत पार पडले. आंदोलनात महिला आणि युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलनकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून होते. त्यामुळे बघता-बघता राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. मुंबईतील प्रवेशद्वारांवरच वाहतूक अडविण्यात आल्याने चाकरमानी मंडळी अडकून पडली. अकोला येथील आनंद गवई आणि माना येथील संजय खंडारे या दोन शहीद जवानांचे पार्थिव ३१ जानेवारी रोजी अकोल्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती, त्यामुळे अकोल्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.यापुढे अनावश्यक प्रतिज्ञापत्र नकोमराठा आरक्षणाविरोधात व समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर २७ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे. मात्र, आता यापुढे कोणत्याही याचिकाकर्त्याने किंवा प्रतिवाद्याने अनावश्यक प्रतिज्ञापत्र दाखल करू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.राज्य सरकारने २०१४ मध्ये मराठा व मुस्लीम समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात अनुक्रमे १६ व पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केतन तिरोडकर व अनेक संस्था व संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर या आरक्षणाच्या समर्थनार्थही अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर मंगळवारी सुनावणी होती. मंगळवारच्या सुनावणीत अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी सरकारच्या भूमिकेत बदल असल्याचे खंडपीठाला सांगितले.