शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावलाय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 27, 2017 07:55 IST

छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
 मुंबई, दि. 27 - देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहशतवाद नष्ट होईल असे जे सांगितले गेले त्या आश्वासनी थोतांडांची सालपटं निघाली आहेत. हजार–पाचशेच्या नोटांमुळे काळा पैसा आणि दहशतवाद वाढला होता या भूलथापा कश्मीर आणि छत्तीसगढमध्ये उघड्या पडल्या आहेत. पुन्हा दोन हजारांच्या गुलाबी नोटांची नकली खाण रोज कुठेना कुठेतरी सापडत आहे. एकंदरीत सगळाच सावळागोंधळ सुरू असून छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
अतिरेक्यांनी केलेला प्रत्येक हल्ला हा भ्याडच असतो, पण या भ्याड हल्ल्यात बळी जात आहेत ते आमच्या लष्करी जवानांचे, सामान्य नागरिकांचे आणि सीआरपीएफ जवानांचे. गेल्या महिनाभरात शंभरच्या आसपास सीआरपीएफ जवान मारले गेले. हे काही चांगल्या कायदा व सुव्यवस्थेचे लक्षण नाही. कश्मीरात व छत्तीसगढमध्ये रक्ताचे सडे पडत असताना आम्ही श्रद्धांजल्यांचे कार्यक्रम पार पाडून ‘राष्ट्रीय कर्तव्यास’ जागत आहोत. जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असे फक्त सांगून काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
कश्मीरातील युद्ध परक्या अतिरेक्यांनी पुकारले व त्यांना पाकड्यांची मदत मिळते आहे, पण छत्तीसगढमध्ये तर पाकडे वळवळत नाहीत. मग त्या देशी अतिरेक्यांचा बीमोड करताना तुमचे हात का थरथरत आहेत? एका क्षणात पंचवीस जवान मारले जातात व आमचे राज्यकर्ते त्या सांडलेल्या रक्ताचा सूड घेऊ शकत नाहीत हे कसले लक्षण म्हणायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
कायदा व सुव्यवस्थेवरून जर दिल्लीने कश्मीरात राष्ट्रपती राजवट लावली तर तोच न्याय छत्तीसगढला लावावा लागेल. कश्मीर आणि छत्तीसगढसारख्या राज्यांमध्ये जवानांच्या बलिदानावर राज्यकारभाराचा गाडा हाकला जात आहे, पण आणखी किती जवानांचे बळी घेऊन राजशकट चालविण्याची हौसमौज आपण करून घेणार आहात? मूठभर नक्षलवादी देशाच्या निमलष्करी दलांना ‘चॅलेंज’ करत आहेत. गनिमी काव्याने खिंडीत गाठून जवानांच्या रक्ताचे सडे पाडत आहेत. लपूनछपून होणाऱ्या अशा भ्याड हल्ल्यांत लढण्याची संधी न मिळताच जवान धारातीर्थी पडत आहेत. हे कुठवर सहन करायचे? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
छत्तीसगढ, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील 200 जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचे अमानुष तत्त्वज्ञान जाऊन पोचले आहे. शोषितांचा, वंचितांचा संघर्ष असे गोंडस नाव देऊन नक्षलींच्या रक्तरंजित कारवायांचे उदात्तीकरण करणाऱ्या मंडळींचाच खरेतर समाचार घेण्याची वेळ आता आली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.