शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावलाय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 27, 2017 07:55 IST

छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
 मुंबई, दि. 27 - देशात सर्वत्रच हिरवा आणि लाल दहशतवाद फोफावला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहशतवाद नष्ट होईल असे जे सांगितले गेले त्या आश्वासनी थोतांडांची सालपटं निघाली आहेत. हजार–पाचशेच्या नोटांमुळे काळा पैसा आणि दहशतवाद वाढला होता या भूलथापा कश्मीर आणि छत्तीसगढमध्ये उघड्या पडल्या आहेत. पुन्हा दोन हजारांच्या गुलाबी नोटांची नकली खाण रोज कुठेना कुठेतरी सापडत आहे. एकंदरीत सगळाच सावळागोंधळ सुरू असून छत्तीसगढ आणि कश्मीरचा हिंसाचार देशाला अराजकाच्या खाईत ढकलताना दिसत आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
अतिरेक्यांनी केलेला प्रत्येक हल्ला हा भ्याडच असतो, पण या भ्याड हल्ल्यात बळी जात आहेत ते आमच्या लष्करी जवानांचे, सामान्य नागरिकांचे आणि सीआरपीएफ जवानांचे. गेल्या महिनाभरात शंभरच्या आसपास सीआरपीएफ जवान मारले गेले. हे काही चांगल्या कायदा व सुव्यवस्थेचे लक्षण नाही. कश्मीरात व छत्तीसगढमध्ये रक्ताचे सडे पडत असताना आम्ही श्रद्धांजल्यांचे कार्यक्रम पार पाडून ‘राष्ट्रीय कर्तव्यास’ जागत आहोत. जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असे फक्त सांगून काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
कश्मीरातील युद्ध परक्या अतिरेक्यांनी पुकारले व त्यांना पाकड्यांची मदत मिळते आहे, पण छत्तीसगढमध्ये तर पाकडे वळवळत नाहीत. मग त्या देशी अतिरेक्यांचा बीमोड करताना तुमचे हात का थरथरत आहेत? एका क्षणात पंचवीस जवान मारले जातात व आमचे राज्यकर्ते त्या सांडलेल्या रक्ताचा सूड घेऊ शकत नाहीत हे कसले लक्षण म्हणायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
कायदा व सुव्यवस्थेवरून जर दिल्लीने कश्मीरात राष्ट्रपती राजवट लावली तर तोच न्याय छत्तीसगढला लावावा लागेल. कश्मीर आणि छत्तीसगढसारख्या राज्यांमध्ये जवानांच्या बलिदानावर राज्यकारभाराचा गाडा हाकला जात आहे, पण आणखी किती जवानांचे बळी घेऊन राजशकट चालविण्याची हौसमौज आपण करून घेणार आहात? मूठभर नक्षलवादी देशाच्या निमलष्करी दलांना ‘चॅलेंज’ करत आहेत. गनिमी काव्याने खिंडीत गाठून जवानांच्या रक्ताचे सडे पाडत आहेत. लपूनछपून होणाऱ्या अशा भ्याड हल्ल्यांत लढण्याची संधी न मिळताच जवान धारातीर्थी पडत आहेत. हे कुठवर सहन करायचे? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
छत्तीसगढ, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील 200 जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचे अमानुष तत्त्वज्ञान जाऊन पोचले आहे. शोषितांचा, वंचितांचा संघर्ष असे गोंडस नाव देऊन नक्षलींच्या रक्तरंजित कारवायांचे उदात्तीकरण करणाऱ्या मंडळींचाच खरेतर समाचार घेण्याची वेळ आता आली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.