शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सर्वकाही शिवसैनिकांच्या भरवशावर

By admin | Updated: February 13, 2017 00:45 IST

जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी

जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी, औरंगाबाद या जिल्हा परिषदांमध्ये सर्वांत मोठा पक्ष असे मर्यादितच यश मागील निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी राहिली आहे. परिणामी, कॉँग्रेसच्या नेत्यांच्या, तसेच कार्यकर्त्यांच्या मुलांनी ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात आघाडी घेतली, असे मानले जात असले, तरी तिला मर्यादितच यश मिळाले आहे. हीच परंपरा चालू निवडणुकीतही कायम राहील, असे दिसते. मुंबईसह कोकणपट्ट्याच्या खालोखाल शिवसेनेचा मराठवाड्यात दबदबा आहे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जेमतेम ताकद असल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेहमीच स्वतंत्रपणे लढविताना शिवसेनेला मर्यादित यश मिळत राहिले आहे. गत निवडणुकीत पंचवीसपैकी हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत मिळाले होते. तेथे पन्नासपैकी सत्तावीस जागा सेनेने जिंकल्या होत्या, तसा तो चमत्कारच होता. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा आहे, पण पंचवीस जागा जिंकून तेथे सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून यश मिळविले असले, तरी बहुमतासाठी चार जागा कमी पडल्या, तेव्हा सात जागा जिंकणाऱ्या भाजपाची मदत घेण्यात आली होती. औरंगाबाद ही तिसरी जिल्हा परिषद होती की, जेथे साठपैकी सर्वाधिक सतरा जागा जिंकून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला होता. पंचवीसपैकी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेला भोपळा फोडता आला नव्हता. सिंधुदुर्ग (४), नगर (६), कोल्हापूर (६), बीड (२), नांदेड (९), लातूर (५), अमरावती (७), वर्धा (१), चंद्रपूर (२), आणि गडचिरोली (२) असे दहा जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचे एक आकडी यश होते. नाशिकमध्ये १७, पुणे १२, जालना १५ आणि परभणीत ११ जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले होते. उर्वरित पाच जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना तिसऱ्या स्थानावर होती. त्यामध्ये रायगड १४, जळगाव १५, उस्मानाबाद १३, बुलडाणा ११ आणि यवतमाळ १२ यांचा समावेश होता. एक आकडी दहा आणि शून्यावर तीन ठिकाणी बाद होणे म्हणजे निम्म्या जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नगण्यच आहे. लोकसभा निवडणूक भाजपाशी युती करून शिवसेनेने पुन्हा घवघवीत यश मिळविले, पण विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती तोडून शिवसेनेची फटफजिती केली. या दोन्ही पक्षांतील एक नंबरचे स्थानही शिवसेनेने गमाविले. या पार्श्वभूमीवर मुंबर्ई महापालिकेच्या राजकारणावरून दोन्ही पक्षांत घमासान चालू आहे. तरीदेखील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीकडे कोणाचे लक्ष नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या या संस्थांमधील वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपाने जवळपास सहा महिन्यांपासून केली आहे. त्या तुलनेने शिवसेनेने याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. कोकणात रत्नागिरीसारख्या बाल्लेकिल्ल्यातसुद्धा नेत्यांची भांडणे सुरू आहेत. परिणामी, बंडखोरीचे लोण वाढले आहे. सत्तेची दावेदार असलेली शिवसेना मात्र मागे पडणार असे दिसते. राष्ट्रवादीची तख्ते आणि भाजपाची मर्यादित ताकद हीच रत्नागिरीत शिवसेनेची जमेची बाजू म्हणता येईल. मुंबई, ठाणे आणि नाशिकची लढत प्रतिष्ठेची करीत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापलीकडे एकही सभा ग्रामीण भागात दिलेली नसल्याने जिल्हा परिषदांचे राजकारण त्यांना दुय्यमच वाटते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेचे चौथे स्थान कोणी हिरावून घेईल, असे वाटत नाही.विदर्भापेक्षा मराठवाड्यात संधीमराठवाड्यात तुलनेने भाजपापेक्षा शिवसेना अधिक चांगली लढत देऊ शकतो. कॉँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध भाजप या लढाईत शिवसेनेला संधी आहे, पण वरिष्ठ नेत्यांकडून शिवसैनिकांना बळच मिळत नाही. नाशिक, नगर, जळगावमध्येही हीच अवस्था आहे. विदर्भात मात्र, शिवसेनेची ताकद कमीच होण्याची शक्यता आहे. -वसंत भोसले