शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

अनुसूचित जाती, जमातींचा सन्मान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:16 IST

उच्च न्यायालय : तिरस्काराने वागवल्यामुळे प्रतिष्ठा, सन्मान हरवल्याचे नोंदवले निरीक्षण

मुंबई : दुकानातील बाटलीतून खाऊ न विचारता घेतल्याने दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. तिरस्काराने वागल्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्यांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान हरवला आहे. त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.इरफान पठाण व सलीम मेहमूद पठाण यांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. ए. एम. बदार यांच्या खंडपीठापुढे या जामीन अर्जांवर सुनावणी होती. या दोघांवरही अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (प्रिव्हेन्शन आॅफ अ‍ॅट्रॉसिटी) अ‍ॅक्ट व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ झाली आहे. अशा प्रकारे तिरस्काराने वागवल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील सदस्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान हरवला आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.या केसमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावरून मुलांवर अत्यंत वाईट प्रकारे अत्याचार केले असल्याचे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.गेल्या वर्षी मे महिन्यात ठाणे पोलिसांनी इरफान पठाण आणि सलीम मेहमूद पठाण यांना अटक केली. ८ व ९ वर्षांच्या दोन मुलांनी त्यांच्या दुकानातील बाटलीतून खाऊ घेतला होता. मात्र हा खाऊ त्यांना न विचारता या मुलांनी घेतल्याने आरोपींनी रागाच्या भरात या मुलांना नग्न करून त्यांची धिंड काढली होती.मुलांना नग्न करून त्यांच्या धिंड काढण्यासोबतच त्यावेळी या मुलांच्या गळ्यात चपलेचा हारदेखील अडकवण्यात आला होता. यादरम्यान या मुलांना मारहाणही करण्यात आली होती. केवळ खाऊ पळवल्यामुळे या मुलांना अशाप्रकारची वाईट शिक्षा करण्यात आली होती. ही दोन्ही मुले अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील आहेत.जामीन अर्ज फेटाळलाजामीन अर्जावर युक्तिवाद करताना पठाण यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या कायद्याअंतर्गत दोषी सिद्ध झाल्यास पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. आरोपींनी आधीच १७ महिने कारागृहात काढले आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी. मात्र, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय