शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

पुनर्मूल्यांकनाची संधी प्रत्येकाला

By admin | Updated: March 14, 2015 05:46 IST

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक

तेजस वाघमारे, मुंबईमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकन अर्ज करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव परीक्षा विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची मान्यता मिळाल्यास या निर्णयाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरण्याची संधी देण्यात येते. परंतु अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला संबंधित विषयात १६ पेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. यामुळे सर्व विषयांत चांगले गुण असताना केवळ एका विषयात १६ पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरता येत नव्हता. याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी बसत आहे. पुनर्मूल्यांकनाची ही अट शिथिल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत होती.विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी अनुत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यालाही पुनर्मूल्यांकन अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची फोटो कॉपीही मिळवता येणार आहे.सध्या पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अर्जासोबत मार्कशीटची झेरॉक्स प्रत जोडावी लागते. त्यामुळे विद्यापीठाकडे प्रत्येक परीक्षेनंतर सुमारे ७0 हजार मार्कशीट्सचे पेपर येतात. विद्यार्थ्याचे परीक्षेचे गुण विद्यापीठाकडे असल्याने पुनर्मूल्यांकनाच्या अर्जासोबत झेरॉक्स प्रतीची आवश्यकता नसल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.