शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनी पाणी जपूनच वापरावे : शरद पवार

By admin | Updated: May 16, 2016 01:11 IST

पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

खडकवासला : ‘‘शहराला पिण्यासाठी व हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी, शेती, कारखानदारीला पाणी देण्यासाठी त्या त्या काळी चार धरणे बांधली. परंतु वाढत्या लोकसंख्यमुळे या धरणांतील सर्वात जास्त पाणी पुणे शहराला द्यावे लागत आहे. त्यानंतर, उर्वरित पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे आता पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. खडकवासला परिसरात ग्रीन थंब संस्थेकडून महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत धरणातील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्रीन थंब संस्थेचे कर्नल सुरेश पाटील, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अंकुश काकडे, जालिंंधर कामठे, कुमार गोसावी, रवींद्र माळवदकर, हेमंत रासने, विकास दांगट, नवनाथ पारगे, नितीन दांगट, किसन जोरी, काका चव्हाण, कैलास खिरीड, आनंद मते, प्रवीण शिंंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, भोर, वेल्हे, मुळशी व हवेली या मावळी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. पूर्वी लाकूडफाटा कोळशा यासाठी जंगल तोडले. सह्याद्रीचे डोंगर बोडके झाले. परिणामी पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येते येऊन धरणे गाळाने भरली गेली. कोयना धरणात परिसरात जंगल जास्त असल्याने त्या धरणात सर्वात कमी गाळ आहे, असेही पवार यांनी सांगितले.व्हिएतनामप्रमाणे धरणसाठ्यात माशांचे पिंंजरे टाकून ‘केज फार्मिंग’ (मत्स्यशेती) करावे. मोठे लोखंडी पिंंजरे तयार करावे. त्यात मत्स्यबीज टाकून ते पिंंजरे मग पाण्यात सोडायचे. त्यांना नियमित खाद्य टाकले, की नऊ महिन्यांत मासा एक किलोचा होतो. त्या देशात हा मोठा व्यवसाय आहे. ही योजना दक्षिणेतील राज्यात सुरू असून, ते दरवर्षी १६ हजार कोंटीचे मासे निर्यात करतात. कोयना धरणात व रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे प्रकल्प राबविला आहे. कर्नल पाटील म्हणाले, सध्या जलयुक्त शिवारचा गाजावाजा होत आहे. परंतु यामध्ये मोठ्या त्रुटी आहेत. पैसा वाया गेला आहे.