शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

सर्वांनी पाणी जपूनच वापरावे : शरद पवार

By admin | Updated: May 16, 2016 01:11 IST

पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

खडकवासला : ‘‘शहराला पिण्यासाठी व हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी, शेती, कारखानदारीला पाणी देण्यासाठी त्या त्या काळी चार धरणे बांधली. परंतु वाढत्या लोकसंख्यमुळे या धरणांतील सर्वात जास्त पाणी पुणे शहराला द्यावे लागत आहे. त्यानंतर, उर्वरित पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे आता पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. खडकवासला परिसरात ग्रीन थंब संस्थेकडून महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत धरणातील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्रीन थंब संस्थेचे कर्नल सुरेश पाटील, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अंकुश काकडे, जालिंंधर कामठे, कुमार गोसावी, रवींद्र माळवदकर, हेमंत रासने, विकास दांगट, नवनाथ पारगे, नितीन दांगट, किसन जोरी, काका चव्हाण, कैलास खिरीड, आनंद मते, प्रवीण शिंंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, भोर, वेल्हे, मुळशी व हवेली या मावळी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. पूर्वी लाकूडफाटा कोळशा यासाठी जंगल तोडले. सह्याद्रीचे डोंगर बोडके झाले. परिणामी पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येते येऊन धरणे गाळाने भरली गेली. कोयना धरणात परिसरात जंगल जास्त असल्याने त्या धरणात सर्वात कमी गाळ आहे, असेही पवार यांनी सांगितले.व्हिएतनामप्रमाणे धरणसाठ्यात माशांचे पिंंजरे टाकून ‘केज फार्मिंग’ (मत्स्यशेती) करावे. मोठे लोखंडी पिंंजरे तयार करावे. त्यात मत्स्यबीज टाकून ते पिंंजरे मग पाण्यात सोडायचे. त्यांना नियमित खाद्य टाकले, की नऊ महिन्यांत मासा एक किलोचा होतो. त्या देशात हा मोठा व्यवसाय आहे. ही योजना दक्षिणेतील राज्यात सुरू असून, ते दरवर्षी १६ हजार कोंटीचे मासे निर्यात करतात. कोयना धरणात व रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे प्रकल्प राबविला आहे. कर्नल पाटील म्हणाले, सध्या जलयुक्त शिवारचा गाजावाजा होत आहे. परंतु यामध्ये मोठ्या त्रुटी आहेत. पैसा वाया गेला आहे.