शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अणुऊर्जेकडे सर्वांनी गांभीर्य पाहायला हवे

By admin | Updated: January 6, 2015 02:20 IST

आण्विक ऊर्जाविषयक संशोधन विकास जगभर सुरू असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे ही आजची नितांत गरज बनली आहे,

मुंबई : आण्विक ऊर्जाविषयक संशोधन विकास जगभर सुरू असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे ही आजची नितांत गरज बनली आहे, असे मत इंडियन सायन्स काँग्रेसच्या सोमवारी तिसऱ्या दिवशी झालेल्या अणुऊर्जाविषयक परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले. ऊर्जा पुरवठा सातत्याने करता यावा यासाठी अणुऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा फायदा घेणे निश्चितच हितकारक ठरेल, असे प्रतिपादन फ्रेंच आल्टरनेटिव्ह एनर्जी अ‍ॅण्ड आॅटोमिक एनर्जी संस्थेचे बर्नार्ड बिगॉट यांनी केले. अणुऊजेर्बाबत लोकांना अनेक समस्या, अडचणी वाटत असल्या तरी आपण अणुऊर्जेच्या फायद्यांबाबत लोकांना समजावून सांगितले पाहिजे. किंबहुना त्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच अणुऊर्जाविषयक संशोधन व विकास याबाबतची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. याबाबतचे ज्ञान जगभरात पोहोचविणे हेही तितकेच गरजेचे आहे, असेही बिगॉट यांनी यावेळी परिसंवादात नमूद केले. अणुऊर्जाविषयी समग्र आणि वैश्विक दृष्टिकोन - वर्तमान आणि भविष्य या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद अणुऊर्जातज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी भूषविले. अन्य वक्त्यांमध्ये आयआयटी मुंबईचे एस. पी. सुखात्मे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे शेखर बासू, गांधीनगरस्थित इन्स्टिटयूट आॅफ प्लाज्मा रिसर्चचे धीरज बोरा, अणुऊर्जा विभागाचे आर. के. सिन्हा आणि कौन्सिल आॅन एनर्जी, एनव्हायरन्मेंट अ‍ॅण्ड वॉटर या संस्थेचे अरूनभ घोष यांचा समावेश होता. अणुऊर्जा आणि त्याची गरज यावर सुखात्मे म्हणाले की, आपण चुकीच्या लोकांना सवलतीमध्ये वीज देतो.अधिक श्रीमंत लोकांसाठी विजेचे अधिक दर यानुसार विविध आर्थिक स्तरांतील लोकांसाठी निरनिराळे विजेचे दर आकारले गेले पाहिजेत. बासू यांनी अणुऊजेर्चा आरोग्यसुविधा, कर्करोग उपचार, औषधोपचार यामधील वापर कसा करता येईल यावर विवेचन केले. (प्रतिनिधी) विविध देशांना ऊर्जा पुरवठ्याची गरज भासत असून त्याची पूर्तता करणे हे सहजसोपे नाही. ऊर्जेसाठी आपण खनिजरूपी इंधनावर तब्बल ८0 टक्के अवलंबून असलो तरी अनेक कारणांनी ही खनिजरूपी ऊर्जा कायमस्वरूपी आपल्याला मिळू शकणार नाही.