शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

अकरावीमध्ये सर्वांना मिळणार प्रवेश

By admin | Updated: June 22, 2016 01:12 IST

पुणे व पिपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे ७३ हजार जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून

पुणे : पुणे व पिपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे ७३ हजार जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारपर्यंत ७२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. एकूण प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज प्राप्त झाले तरी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहान पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी ८४ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन लॉगइन केले आहे. मात्र, त्यातील ७८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला असून ७२ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला व दुसरा दोन्ही भाग भरले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत ७२ हजार ८८७ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. अकरावीच्या ७३ हजार जागांसाठी सध्या आॅनलाईन पध्दतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. तसेच इन हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश महाविद्यालयांकडून दिले जात आहेत. मात्र, प्रवेशासाठी ७३ हजाराहून अधिक अर्ज आल्यास आपल्याला प्रवेश मिळेल का? अशी शंका पालक व विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. परंतु, अर्ज करणारे सर्वच विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेणार नाहीत. काही विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रास किंवा आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेतील. त्यामुळे अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहतील. परिणामी आॅनलाईन अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे.नवीन महाविद्यालयांत प्रवेशाचा गोंधळ कायमपुणे : राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवड येथील चाळीसहून अधिक शैक्षणिक संस्थांना चालू शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत या महाविद्यालयांचा समावेश करता येणे शक्य नाही. परिणामी नवीन महाविद्यालयांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार व त्याने दिलेल्या महाविद्यालयांच्या पसंती क्रमानुसार प्रवेश मिळणार आहे. मात्र ,राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील काही शैक्षणिक संस्थांना चालू शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अकरावीचे सर्व प्रवेश केवळ आॅनलाईन पध्दतीनेच करावेत, असे स्पष्ट आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमधील प्रवेश आॅफलाईन पद्धतीने करण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी दिली जात नाही. शिक्षणसंस्थाचालक गेल्या काही दिवसांपासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात याबाबत विचारणा करण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या महाविद्यालयांमधील जागांच्या प्रवेशाचा विचार केला जाणार आहे. त्यातच जुलै-आॅगस्टमध्ये दहावीची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे जुलै-आॅगस्टच्या परीक्षेत उत्तीर्ण दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.