शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

‘पी अ‍ॅण्ड टी’तील सोसायट्यांत दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 03:45 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा पुन्हा समावेश झाल्यानंतर त्या गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा पुन्हा समावेश झाल्यानंतर त्या गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. येथील आधीच्या नांदिवली ग्रामपंचायतीमधील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत राहणाऱ्या २२ सोसायट्यांतील रहिवाशांना दीड-दोन वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. स्थानिक नगरसेवकासह महापालिका प्रशासनाने पाठ फिरवल्याने रहिवाशांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले आहे. तरीही, येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. उलट, तो दिवसेंदिवस भीषण होत आहे. गंगा, सर्वोदय पार्क, साई समर्थ, बालाजी दर्शन, श्रेया, गणराज, यमुना, सरस्वती आदी सोसायट्यांतील त्रस्त रहिवाशांनी यासंदर्भात एकत्र येत आवाज उठवला आहे. या ठिकाणी आता खाजगी तत्त्वावर दिवसाआड ११०० रुपये मोजून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. २२ ते २५ सोसायट्यांना हा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. राजेश खोत आणि ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, आधी ग्रामपंचायत होती, तेव्हाही पाण्याचा प्रश्न होताच. आता तो तीव्र झाला आहे. नगरसेविका रूपाली रवी म्हात्रेंसह पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पण, पालिका प्रशासनाने बघतो-करतो, अशी उत्तरे देत वेळ मारून नेली. नगरसेविका म्हात्रे यांनी वर्षभरापासून स्वखर्चाने आठवड्याला एक टँकर देण्यासाठी पुढाकार घेतला. पण, पाणीटंचाईसमोर त्यांचे साहाय्य तोकडे पडत आहे. पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवल्यावर तातडीने संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. सूत्रे हलली. पण, ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ची स्थिती झाल्याचे ज्ञानेश्वर म्हणाले. ही समस्या असूनही गंगा सोसायटीने पाण्यासह अन्य करांबाबतचे ८६ हजारांचे बिल भरले. पाणीपट्टी भरूनही ही अवस्था असेल, तर बिल न भरणे योग्य आहे का? जे नियमाने वागतात, त्यांच्या वाट्याला हा अन्याय का, असा सवाल त्यांनी केला.येथील पाणीसमस्या लवकरच निकाली निघेल. पुढील शुक्रवारपर्यंत मीटर टाकण्याची कामे होतील. त्यानंतर, चांगल्या पद्धतीने पाणी मिळेल. त्या कामासाठीच मी ई-प्रभागात ठाण मांडले आहे. - रवी म्हात्रे, नगरसेविका,रूपाली म्हात्रेंचे पतीसोसायट्यांनी माझ्याशीही संपर्क साधला आहे. त्यांची अडचण रास्त आहे. मी देखील तेथे टँकरने पाणी दिले होते. आठवडाभरात त्यांना न्याय न मिळाल्यास महापालिकेवर रहिवाशांचा मोर्चा काढण्यात येईल. - भाऊसाहेब चौधरी, शिवसेना शहरप्रमुख-डोंबिवली