शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: December 29, 2014 05:00 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे,

पुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे ग्रामविकास, जलसंधारण आणि रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे सांगितले. त्यासाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ मोहिमेतील जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहन त्यांनी पुणे विभागातील अधिकाऱ्यांच्या यशदा येथील कार्यशाळेत केले. मुंडे म्हणाल्या की, वारंवार उद्भवणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने प्रभावीपणे काम करायला हवे. त्याचबरोबर लोकसहभागाशिवाय ही योजना यशस्वी होऊ शकणार नाही. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याचा या योजनेत प्रयत्न असेल. योजनेच्या यशस्वीतेची त्रयस्थ घटकाकडून तपासणी केली जाईल.पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे जिल्ह्यात योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व जबाबदारी उचलू, अशी ग्वाही दिली. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या योजनेमुळे गावे टंचाईमुक्त होतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)