शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संघ परिवाराच्या हर घर एक व्होटला यश

By admin | Updated: March 11, 2017 20:05 IST

उत्तरप्रदेशमधील भाजपाच्या अभूतपुर्व यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मौलिक वाटा राहिला

योगेश पांडेनागपूर, दि. 11 : उत्तरप्रदेशमधील भाजपाच्या अभूतपुर्व यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मौलिक वाटा राहिला. पडद्याआड कार्य करत संघ परिवारातील विविध संघटनांनी विजयाचा पाया रचला. निवडणूकांच्या काही काळ अगोदरपासून संघ परिवाराने हर घर एक व्होट ही मोहिमच राबविली. या मोहिमेमुळे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपाला मोठी मदत झाली. संघाचे काही पदाधिकारीदेखील निवडणूकांच्या काळात उत्तरप्रदेशमध्ये विशेष सक्रिय झाले होते हे विशेष.

२०१४ मधील लोकसभा निवडणूकांत उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला होता. देशात समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, यासाठी संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ वाढण्यासाठी उत्तरप्रदेशात सत्ता येणे अत्यावश्यक होते. ही बाब संघाचे पदाधिकारी जाणून होते. दिल्ली, बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर संघाने उत्तरप्रदेशवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.

अखिल भारतीय सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांच्यासह संघाचे अनेक अखिल भारतीय प्रतिनिधींनी उत्तरप्रदेशमध्ये संघवाढीवर विशेष भर दिला. मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. विहिंपदेखील सक्रियघरवापसी व गोरक्षकांच्या वादामुळे विश्व हिंदू परिषदेमध्ये भाजपाबाबत काहीसा नाराजीचा सूर होता. मात्र उत्तरप्रदेश निवडणूकांचे महत्त्व विहिंपला माहिती असल्याने त्यांचे कार्यकर्तेदेखील प्रचारादरम्यान सक्रिय होते. डिसेंबर २०१६ मध्ये नागपुरात विहिंपची केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशन झाले होते. त्यात विहिंपचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनी स्पष्ट संकेतदेखील दिले होते.सामाजिक समरसतेवर संघाचा भर२०१५ साली नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघाने सामाजिक समरसतेचा ठराव संमत केला होता. देशभरात त्यानंतर विविध सर्वेक्षणे घेण्यात आली व संघ सर्व जातीधर्मांसोबत आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संघ स्वयंसेवक कार्याला लागले. उत्तरप्रदेशमध्ये सामाजिक समरसतेसंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात आली. यामुळे सर्व जातीधर्माच्या मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश गेला होता, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली.