शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अखेर रस्ता झाला पूर्ववत

By admin | Updated: April 29, 2016 01:57 IST

रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते.

रावेत : वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकातील जलवाहिनीसाठी रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन मुख्य चौकातील रस्ता पूर्ववत केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.वाल्हेकरवाडी येथील मुख्य शिवाजी चौकात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्याकरिता खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे राडारोडा रस्त्यावर तसाच पडून होता. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत होते. नागरिकांना पायी चालणेसुद्धा अवघड झाले होते. भूमिगत जलवाहिन्यांचे काम पूर्ण होऊन काही दिवस उलटूनही या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते ठेकेदाराने व्यवस्थित बुजविले नव्हते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता . परिसरातील जलवाहिन्या गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या होत्या. त्या बदलाव्यात, अशी मागणी नागरिकांची होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले. परंतु, या भागातील खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. रस्ते खड्डेमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना तेथून जाताना कसरत करावी लागत होती.या भागातील रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यातच सर्वत्र रस्ते खोदून रस्त्याची चाळण झाली होती. मुख्य चौकातील जलवाहिनी वारंवार फुटत असल्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी कामे करण्यात आली. मात्र, यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिक करीत होते. (वार्ताहर)