शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

अखेर त्या औद्योगिक वसाहतीवरील कारवाई टळली

By admin | Updated: August 25, 2015 02:38 IST

ग्रामपंचायतीच्या काळापासून सुमारे ३५ वर्षांपासून वसलेल्या एमआय, कुसुमघर व खोदे औद्योगिक वसाहती रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली

भार्इंदर : ग्रामपंचायतीच्या काळापासून सुमारे ३५ वर्षांपासून वसलेल्या एमआय, कुसुमघर व खोदे औद्योगिक वसाहती रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली सोमवारी जमीनदोस्त करण्याची कारवाई आपल्याला विश्वासात न घेताच होत असल्याने संतापलेले आ. प्रताप सरनाईक यांनी कारवाईपूर्वीच तेथे ठाण मांडून आयुक्त अच्युत हांगे यांना कारवाई मागे घेण्यास भाग पाडल्याने त्या पुढाऱ्याच्या मनसुब्यावर अखेर पाणी फिरल्याची चर्चा शहरात सुरू झाली. अधिकृत परवानगीने वसलेली औद्योगिक वसाहत सध्याच्या विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याचे कारण देत त्यावर बुलडोझर फिरविण्याची तयारी प्रशासनासह पोलिसांनी आदल्याच दिवशी करून ठेवली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही टोकांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली असताना ती दुर्लक्षित करून औद्योगिक वसाहतींनाच टार्गेट करण्यात आले होते. त्यात राजकीय दबावतंत्राचा वापर झाल्याची माहिती मिळताच संतप्त उद्योजकांनी त्वरित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन २५ आॅगस्टपर्यंत कारवाईवर स्थगिती आदेश मिळविला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्थानिक पुढाऱ्याने येथील बंदावस्थेतील खाजगी कंपनी खरेदी केली असून त्याच्या नियोजित विकासात येथील अरुंद रस्ता अडचणीचा ठरत आहे. त्यातच येथील काही औद्योगिक वसाहतींच्या जागेवर इमारती बांधल्याने ही वसाहतच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रिकामी केल्यास तेथे इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने त्या पुढाऱ्याने रस्त्याच्या मध्यभागी वसलेल्या वसाहतीलाच टार्गेट केले आहे. त्यासाठी त्या पुढाऱ्याने वरिष्ठांच्या मदतीने आयुक्त अच्युत हांगे यांच्यावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याने प्रशासनाने १३ आॅगस्ट रोजी तेथील गाळेधारकांना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा धाडल्या. कागदपत्रे सादर करून नियमानुसार सुनावणी होणे अपेक्षित असताना त्याला बगल देत प्रशासनाने २१ आॅगस्ट रोजी थेट गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या. त्यामुळे हवालदिल झालेल्या गाळेधारकांनी आ. सरनाईक यांच्याकडे धाव घेऊन कारवाई रोखण्याची विनंती केली. त्यानुसार, आ. सरनाईक यांनी सोमवारी कारवाईपूर्वीच तेथे धाव घेऊन बाधितांना योग्य मोबदला दिल्यानंतरच त्यांचे गाळे तोडण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे लावून धरली.त्याला प्रतिसाद देत आयुक्तांनी त्या गाळेधारकांना नव्याने कागदपत्रे सादर करण्यास सांगून सुनावणीनंतरच कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन गाळेधारकांना देत कारवाई तूर्तास मागे घेतल्याचे स्पष्ट केले.