शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अखेर त्या औद्योगिक वसाहतीवरील कारवाई टळली

By admin | Updated: August 25, 2015 02:38 IST

ग्रामपंचायतीच्या काळापासून सुमारे ३५ वर्षांपासून वसलेल्या एमआय, कुसुमघर व खोदे औद्योगिक वसाहती रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली

भार्इंदर : ग्रामपंचायतीच्या काळापासून सुमारे ३५ वर्षांपासून वसलेल्या एमआय, कुसुमघर व खोदे औद्योगिक वसाहती रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली सोमवारी जमीनदोस्त करण्याची कारवाई आपल्याला विश्वासात न घेताच होत असल्याने संतापलेले आ. प्रताप सरनाईक यांनी कारवाईपूर्वीच तेथे ठाण मांडून आयुक्त अच्युत हांगे यांना कारवाई मागे घेण्यास भाग पाडल्याने त्या पुढाऱ्याच्या मनसुब्यावर अखेर पाणी फिरल्याची चर्चा शहरात सुरू झाली. अधिकृत परवानगीने वसलेली औद्योगिक वसाहत सध्याच्या विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याचे कारण देत त्यावर बुलडोझर फिरविण्याची तयारी प्रशासनासह पोलिसांनी आदल्याच दिवशी करून ठेवली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही टोकांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली असताना ती दुर्लक्षित करून औद्योगिक वसाहतींनाच टार्गेट करण्यात आले होते. त्यात राजकीय दबावतंत्राचा वापर झाल्याची माहिती मिळताच संतप्त उद्योजकांनी त्वरित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन २५ आॅगस्टपर्यंत कारवाईवर स्थगिती आदेश मिळविला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका स्थानिक पुढाऱ्याने येथील बंदावस्थेतील खाजगी कंपनी खरेदी केली असून त्याच्या नियोजित विकासात येथील अरुंद रस्ता अडचणीचा ठरत आहे. त्यातच येथील काही औद्योगिक वसाहतींच्या जागेवर इमारती बांधल्याने ही वसाहतच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रिकामी केल्यास तेथे इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने त्या पुढाऱ्याने रस्त्याच्या मध्यभागी वसलेल्या वसाहतीलाच टार्गेट केले आहे. त्यासाठी त्या पुढाऱ्याने वरिष्ठांच्या मदतीने आयुक्त अच्युत हांगे यांच्यावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याने प्रशासनाने १३ आॅगस्ट रोजी तेथील गाळेधारकांना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा धाडल्या. कागदपत्रे सादर करून नियमानुसार सुनावणी होणे अपेक्षित असताना त्याला बगल देत प्रशासनाने २१ आॅगस्ट रोजी थेट गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या. त्यामुळे हवालदिल झालेल्या गाळेधारकांनी आ. सरनाईक यांच्याकडे धाव घेऊन कारवाई रोखण्याची विनंती केली. त्यानुसार, आ. सरनाईक यांनी सोमवारी कारवाईपूर्वीच तेथे धाव घेऊन बाधितांना योग्य मोबदला दिल्यानंतरच त्यांचे गाळे तोडण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे लावून धरली.त्याला प्रतिसाद देत आयुक्तांनी त्या गाळेधारकांना नव्याने कागदपत्रे सादर करण्यास सांगून सुनावणीनंतरच कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन गाळेधारकांना देत कारवाई तूर्तास मागे घेतल्याचे स्पष्ट केले.