शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

...आजही जुन्या गीतांनीच उजळते दिवाळी!

By admin | Updated: October 29, 2016 23:55 IST

सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९०

नाशिक : सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९० पर्यंतच्या काळात तयार झालेली ही गाणीच रसिकांचे कान तृप्त करीत असली, तरी अशीच दर्जेदार नवीन गाणीही तयार व्हायला पाहिजेत, अशी मागणी तरुणाईतून होत आहे. मानवी भाव-भावनांचे आणि समाजाचे प्रतिबिंब नेहमीच चित्रपटांमधून उमटलेले दिसून येते. पूर्वी मराठी चित्रपटांमध्ये सणासुदीची परंपरा, व्रतवैकल्ये विशेषत्वाने येत राहिली. त्यात दिवाळी सण हा नेहमीच दिग्दर्शक-निर्मात्यांना खुणावत आला आहे. वैविध्यपूर्ण विषय हाताळत मराठी चित्रपटांनी आता कात टाकली असली, तरी दिवाळी सण, परंपरा यांच्याशी मात्र काहीशी फारकत घेतलेली दिसून येते. (प्रतिनिधी)जुन्यांची ओळख दाखवली जात नाहीदिवाळी सणाचे वेध लागले की, रेडिओ-दूरचित्रवाणीवर जुनी गीते ऐकविली जातात आणि लोकांच्या ओठी रुंजी घालतात. दुर्दैवाने, या अजरामर गीतांचे गीतकार मात्र विस्मृतीत गेले आहेत. एफएम रेडिओवर जेव्हा ही गीते ऐकविली जातात, त्या वेळी गीतकारांचा ओझरता उल्लेख होतो. या गीतकारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे सौजन्य दाखविले जात नाही.सर्वाधिक ऐकविले जाणारे गाणे म्हणजे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली’. गीतकार मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले हे गीत ‘अष्टविनायक’ या चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी गायिलेले आहे. याशिवाय, पी. सावळाराम यांचे ‘बायकोचा भाऊ’ या चित्रपटातील ‘आली दिवाळी आली दिवाळी’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील बाळ कोल्हटकर यांचे ‘आली आली दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी’, दत्ता डावजेकर यांचे लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘आली दिवाळी मंगलदारी, आनंद झाला घरोघरी’, ‘तू सुखी रहा’ या चित्रपटातील गदिमा यांचे ‘दिव्या दिव्यांच्या लावून ओळी, करीन साजरी आज दिवाळी’, ‘माझा मुलगा’ या चित्रपटातील यशवंत देव यांचे ‘दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी, आमच्या घरी अन् तुमच्या घरी’, ‘ते माझे घर’ या चित्रपटातील रवींद्र भट यांचे ‘तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती’, ‘भाऊबीज’ चित्रपटातील कवी संजीव तथा कृष्णा गंगाधर दीक्षित यांचे ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती’ यासारखी दिवाळी सणावरची गीते अजरामर ठरलेली आहेत. सध्याच्या पिढीत अशी गीते कधी ऐकायला मिळणार, याचीच तरुणाईला प्रतीक्षा आहे.