शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

...आजही जुन्या गीतांनीच उजळते दिवाळी!

By admin | Updated: October 29, 2016 23:55 IST

सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९०

नाशिक : सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९० पर्यंतच्या काळात तयार झालेली ही गाणीच रसिकांचे कान तृप्त करीत असली, तरी अशीच दर्जेदार नवीन गाणीही तयार व्हायला पाहिजेत, अशी मागणी तरुणाईतून होत आहे. मानवी भाव-भावनांचे आणि समाजाचे प्रतिबिंब नेहमीच चित्रपटांमधून उमटलेले दिसून येते. पूर्वी मराठी चित्रपटांमध्ये सणासुदीची परंपरा, व्रतवैकल्ये विशेषत्वाने येत राहिली. त्यात दिवाळी सण हा नेहमीच दिग्दर्शक-निर्मात्यांना खुणावत आला आहे. वैविध्यपूर्ण विषय हाताळत मराठी चित्रपटांनी आता कात टाकली असली, तरी दिवाळी सण, परंपरा यांच्याशी मात्र काहीशी फारकत घेतलेली दिसून येते. (प्रतिनिधी)जुन्यांची ओळख दाखवली जात नाहीदिवाळी सणाचे वेध लागले की, रेडिओ-दूरचित्रवाणीवर जुनी गीते ऐकविली जातात आणि लोकांच्या ओठी रुंजी घालतात. दुर्दैवाने, या अजरामर गीतांचे गीतकार मात्र विस्मृतीत गेले आहेत. एफएम रेडिओवर जेव्हा ही गीते ऐकविली जातात, त्या वेळी गीतकारांचा ओझरता उल्लेख होतो. या गीतकारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे सौजन्य दाखविले जात नाही.सर्वाधिक ऐकविले जाणारे गाणे म्हणजे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली’. गीतकार मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले हे गीत ‘अष्टविनायक’ या चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी गायिलेले आहे. याशिवाय, पी. सावळाराम यांचे ‘बायकोचा भाऊ’ या चित्रपटातील ‘आली दिवाळी आली दिवाळी’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील बाळ कोल्हटकर यांचे ‘आली आली दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी’, दत्ता डावजेकर यांचे लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘आली दिवाळी मंगलदारी, आनंद झाला घरोघरी’, ‘तू सुखी रहा’ या चित्रपटातील गदिमा यांचे ‘दिव्या दिव्यांच्या लावून ओळी, करीन साजरी आज दिवाळी’, ‘माझा मुलगा’ या चित्रपटातील यशवंत देव यांचे ‘दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी, आमच्या घरी अन् तुमच्या घरी’, ‘ते माझे घर’ या चित्रपटातील रवींद्र भट यांचे ‘तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती’, ‘भाऊबीज’ चित्रपटातील कवी संजीव तथा कृष्णा गंगाधर दीक्षित यांचे ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती’ यासारखी दिवाळी सणावरची गीते अजरामर ठरलेली आहेत. सध्याच्या पिढीत अशी गीते कधी ऐकायला मिळणार, याचीच तरुणाईला प्रतीक्षा आहे.