शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

...आजही जुन्या गीतांनीच उजळते दिवाळी!

By admin | Updated: October 29, 2016 23:55 IST

सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९०

नाशिक : सणासुदीचे औचित्य साधून एफएम रेडिओवरून जी गाणी ऐकवली जातात, त्यासाठी आजही चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा आधार घ्यावा लागतो. स्वातंत्र्यानंतर १९९० पर्यंतच्या काळात तयार झालेली ही गाणीच रसिकांचे कान तृप्त करीत असली, तरी अशीच दर्जेदार नवीन गाणीही तयार व्हायला पाहिजेत, अशी मागणी तरुणाईतून होत आहे. मानवी भाव-भावनांचे आणि समाजाचे प्रतिबिंब नेहमीच चित्रपटांमधून उमटलेले दिसून येते. पूर्वी मराठी चित्रपटांमध्ये सणासुदीची परंपरा, व्रतवैकल्ये विशेषत्वाने येत राहिली. त्यात दिवाळी सण हा नेहमीच दिग्दर्शक-निर्मात्यांना खुणावत आला आहे. वैविध्यपूर्ण विषय हाताळत मराठी चित्रपटांनी आता कात टाकली असली, तरी दिवाळी सण, परंपरा यांच्याशी मात्र काहीशी फारकत घेतलेली दिसून येते. (प्रतिनिधी)जुन्यांची ओळख दाखवली जात नाहीदिवाळी सणाचे वेध लागले की, रेडिओ-दूरचित्रवाणीवर जुनी गीते ऐकविली जातात आणि लोकांच्या ओठी रुंजी घालतात. दुर्दैवाने, या अजरामर गीतांचे गीतकार मात्र विस्मृतीत गेले आहेत. एफएम रेडिओवर जेव्हा ही गीते ऐकविली जातात, त्या वेळी गीतकारांचा ओझरता उल्लेख होतो. या गीतकारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे सौजन्य दाखविले जात नाही.सर्वाधिक ऐकविले जाणारे गाणे म्हणजे ‘आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली’. गीतकार मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले हे गीत ‘अष्टविनायक’ या चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी गायिलेले आहे. याशिवाय, पी. सावळाराम यांचे ‘बायकोचा भाऊ’ या चित्रपटातील ‘आली दिवाळी आली दिवाळी’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील बाळ कोल्हटकर यांचे ‘आली आली दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी’, दत्ता डावजेकर यांचे लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘आली दिवाळी मंगलदारी, आनंद झाला घरोघरी’, ‘तू सुखी रहा’ या चित्रपटातील गदिमा यांचे ‘दिव्या दिव्यांच्या लावून ओळी, करीन साजरी आज दिवाळी’, ‘माझा मुलगा’ या चित्रपटातील यशवंत देव यांचे ‘दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी, आमच्या घरी अन् तुमच्या घरी’, ‘ते माझे घर’ या चित्रपटातील रवींद्र भट यांचे ‘तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती’, ‘भाऊबीज’ चित्रपटातील कवी संजीव तथा कृष्णा गंगाधर दीक्षित यांचे ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती’ यासारखी दिवाळी सणावरची गीते अजरामर ठरलेली आहेत. सध्याच्या पिढीत अशी गीते कधी ऐकायला मिळणार, याचीच तरुणाईला प्रतीक्षा आहे.