शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

संमेलनाआधीच निमंत्रण‘नाट्य’

By admin | Updated: February 19, 2016 03:28 IST

नाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात

महेंद्र सुके ,  ठाणेनाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात किंवा अध्यक्षीय भाषणात मांडलेल्या मुद्द्यांविषयीचा पाठपुरावा करण्याची संधीच मिळत नाही, अशी खंत बेळगाव येथे झालेल्या ९५व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ रंगकर्मी फय्याज शेख यांनी व्यक्त केली. परिणामी, ठरावांच्या पाठपुराव्याकरिता समिती नेमण्याचा निर्णय केवळ कागदावर राहिला आहे.खुल्या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होण्यासाठी संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ‘पाठपुरावा समिती’ स्थापन करून प्रलंबित ठराव मार्गी लागावेत, अशी घोषणा बेळगावच्या संमेलनात करण्यात आली होती. याविषयी, फय्याज यांना विचारले असता, नाट्य परिषद नाट्यसंमेलनस्थळी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना बोलवत असते. त्या बैठकीत झालेले ठराव खुल्या अधिवेशनात पारित करण्यात येतात; मात्र संमेलन संपल्यानंतर वर्षभर त्याविषयी काहीही सांगितले जात नाही. वर्षभरात होणाऱ्या बैठकांना बोलावलेच जात नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात फय्याज अध्यक्षपदाची सूत्रे ९६व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्याकडे सोपविणार आहेत. त्यानिमित्ताने फय्याज यांनी व्यक्त केलेली खंत आणि नाट्य परिषदेने राबविलेल्या अभिनंदनीय उपक्रमांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.नाट्यसंमेलनावर बालनाट्यांचा प्रभावठाणे : नाट्यसंमेलनावर या वर्षी बालनाट्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. रविवारी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात ‘शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा समावेश करावा’ हा महत्त्वाचा ठराव मांडला जाऊ शकतो.नाट्यसंमेलनाच्या समारोपाला रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीचे औचित्य साधून ‘नाट्यशिक्षणा’चा ठराव मांडला जाण्याची चर्चा परिषदेच्या वर्तुळात आहे.बेळगाव येथे झालेले ९५वे नाट्यसंमेलन तेथील पोलिसांनी आयोजकांवर लादलेल्या अटी आणि शर्तींवर झाले होते. त्यामुळे ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रा’चा दरवर्षी येणारा ठराव त्या संमेलनात नव्हता. ठाण्याच्या संमेलनात हाही ठराव परंपरेने येण्याची शक्यता आहे. बालरंगभूमी सक्षम व्हावी, बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी बालनाट्यसंमेलन घेण्याचा ठराव बेळगावच्या नाट्यसंमेलनात एकमताने मंजूर झाला होता. त्यानुसार, सोलापुरात हे संमेलन घेण्यात आले. यासाठी राज्य शासनाकडे १ कोटी रुपयांची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, हे मात्र समजू शकले नाही. ठाण्यात होणाऱ्या संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत मोठ्या प्रमाणात बालनाट्ये सादर होणार आहेत. या वर्षी राज्य सरकारने घेतलेल्या बालनाट्य स्पर्धेत ठाण्याचे ‘डराव डराव’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले होते. या नाटकासह अनेक बालनाट्यांचे आविष्कार या संमेलनात रसिकांना पाहता येतील. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.