शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

संमेलनाआधीच निमंत्रण‘नाट्य’

By admin | Updated: February 19, 2016 03:28 IST

नाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात

महेंद्र सुके ,  ठाणेनाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात किंवा अध्यक्षीय भाषणात मांडलेल्या मुद्द्यांविषयीचा पाठपुरावा करण्याची संधीच मिळत नाही, अशी खंत बेळगाव येथे झालेल्या ९५व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ रंगकर्मी फय्याज शेख यांनी व्यक्त केली. परिणामी, ठरावांच्या पाठपुराव्याकरिता समिती नेमण्याचा निर्णय केवळ कागदावर राहिला आहे.खुल्या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होण्यासाठी संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ‘पाठपुरावा समिती’ स्थापन करून प्रलंबित ठराव मार्गी लागावेत, अशी घोषणा बेळगावच्या संमेलनात करण्यात आली होती. याविषयी, फय्याज यांना विचारले असता, नाट्य परिषद नाट्यसंमेलनस्थळी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना बोलवत असते. त्या बैठकीत झालेले ठराव खुल्या अधिवेशनात पारित करण्यात येतात; मात्र संमेलन संपल्यानंतर वर्षभर त्याविषयी काहीही सांगितले जात नाही. वर्षभरात होणाऱ्या बैठकांना बोलावलेच जात नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात फय्याज अध्यक्षपदाची सूत्रे ९६व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्याकडे सोपविणार आहेत. त्यानिमित्ताने फय्याज यांनी व्यक्त केलेली खंत आणि नाट्य परिषदेने राबविलेल्या अभिनंदनीय उपक्रमांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.नाट्यसंमेलनावर बालनाट्यांचा प्रभावठाणे : नाट्यसंमेलनावर या वर्षी बालनाट्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. रविवारी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात ‘शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा समावेश करावा’ हा महत्त्वाचा ठराव मांडला जाऊ शकतो.नाट्यसंमेलनाच्या समारोपाला रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीचे औचित्य साधून ‘नाट्यशिक्षणा’चा ठराव मांडला जाण्याची चर्चा परिषदेच्या वर्तुळात आहे.बेळगाव येथे झालेले ९५वे नाट्यसंमेलन तेथील पोलिसांनी आयोजकांवर लादलेल्या अटी आणि शर्तींवर झाले होते. त्यामुळे ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रा’चा दरवर्षी येणारा ठराव त्या संमेलनात नव्हता. ठाण्याच्या संमेलनात हाही ठराव परंपरेने येण्याची शक्यता आहे. बालरंगभूमी सक्षम व्हावी, बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी बालनाट्यसंमेलन घेण्याचा ठराव बेळगावच्या नाट्यसंमेलनात एकमताने मंजूर झाला होता. त्यानुसार, सोलापुरात हे संमेलन घेण्यात आले. यासाठी राज्य शासनाकडे १ कोटी रुपयांची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, हे मात्र समजू शकले नाही. ठाण्यात होणाऱ्या संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत मोठ्या प्रमाणात बालनाट्ये सादर होणार आहेत. या वर्षी राज्य सरकारने घेतलेल्या बालनाट्य स्पर्धेत ठाण्याचे ‘डराव डराव’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले होते. या नाटकासह अनेक बालनाट्यांचे आविष्कार या संमेलनात रसिकांना पाहता येतील. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात नाट्यशिक्षणाचा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.