शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा महाग झाला तरी शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच

By admin | Updated: August 27, 2015 02:10 IST

मुंबईमध्ये कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बाजार समितीमध्ये फक्त १० टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवतात. उर्वरित ९० टक्के

- नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबईमध्ये कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बाजार समितीमध्ये फक्त १० टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवतात. उर्वरित ९० टक्के आवक नाशिक, पुणे व इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडूनच होते. भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी येत असताना दुसरीकडे घाम गाळून उत्पादन करणाऱ्या बळीराजालाही ही स्थिती पहात बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. चीनपाठोपाठ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश असलेल्या भारतामधील सर्वच राज्यांत कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. देशात सर्वाधिक कांदा महाराष्ट्रात पिकत असून येथील बहुतांश किरकोळ मार्केटमध्ये चांगला कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रत्यक्षात या भाववाढीचा सामान्य शेतकऱ्यांना फारसा लाभ झाला नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये स्वत: शेतकरी माल पाठविण्याचे प्रमाण फक्त दहा टक्केच आहे. मार्केटमध्ये शेतकरी दिसतच नाहीत. व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता थेट शेतकऱ्यांकडून खूप कमी माल येत असल्याची माहिती देण्यात आली. गारपिटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. कांदा पिकविण्यासाठी आलेला खर्च भरून काढण्यासाठी कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाची मार्च ते मे दरम्यानच विक्री केली आहे.मुंबईमध्ये फक्त दहा टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवत आहेत. कधी - कधी हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांवर जाते. उर्वरित ९० टक्के कांदा हा नाशिक, पुणे, कर्नाटक परिसरातील व्यापारीच पाठवत आहेत. ज्यांच्याकडे चाळीमध्ये माल साठविण्याची क्षमता आहे व ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आहे त्यांनी मार्च ते मे दरम्यान १० ते १३ रुपये दराने कांदा विकत घेऊन तो चाळीमध्ये साठवला आहे. भाववाढ झाल्यानंतर हा माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला जात आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज किती शेतकरी येतात याचे सर्वेक्षण केले तरी वास्तव समोर येईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कर्नाटकचाही कांदा मुंबईतमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तसह कर्नाटकचा कांदाही विक्रीसाठी आला आहे. इजिप्तच्या कांद्याचा आकार मोठा असल्यामुळे सामान्य ग्राहकांची त्याला पसंती मिळत नाही. होलसेल मार्केटमध्ये कांदा ४० ते ६० रुपये किलो दरानेच विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर आहेत. गगनाला भिडलेले भाव अद्याप कमी झालेले नाहीत. सरकारने आयातीला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. इजिप्तवरूनही कांदा मागविण्यात आला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये ५६ वाहनांमधून ६२८ टन कांद्याची आवक झाली आहे. ९० टक्के कांदा हा नाशिक, पुणे, कर्नाटक परिसरातील व्यापारीच पाठवत आहेत, उर्वरित माल हा महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिसरातून येत आहे.शेतकरी व ग्राहक दोघांच्याही डोळ्यात पाणी : बाजार समितीमध्ये आलेल्या पुणे जिल्ह्णातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, भाववाढ झाल्यामुळे मुंबईतील ग्राहकांना ८० रुपये किलो दराने कांदा घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना खूप फायदा होत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. परंतु छोट्या शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा मार्च ते मे दरम्यान १० ते १३ रुपये दराने विकला आहे. कारण त्यांना कांदा साठवणे परवडत नाही. परिणामी भाववाढीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांच्याही डोळ््यांत पाणी आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.