शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

कांदा महाग झाला तरी शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच

By admin | Updated: August 27, 2015 02:10 IST

मुंबईमध्ये कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बाजार समितीमध्ये फक्त १० टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवतात. उर्वरित ९० टक्के

- नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबईमध्ये कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले असले तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बाजार समितीमध्ये फक्त १० टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवतात. उर्वरित ९० टक्के आवक नाशिक, पुणे व इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडूनच होते. भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी येत असताना दुसरीकडे घाम गाळून उत्पादन करणाऱ्या बळीराजालाही ही स्थिती पहात बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. चीनपाठोपाठ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश असलेल्या भारतामधील सर्वच राज्यांत कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. देशात सर्वाधिक कांदा महाराष्ट्रात पिकत असून येथील बहुतांश किरकोळ मार्केटमध्ये चांगला कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु प्रत्यक्षात या भाववाढीचा सामान्य शेतकऱ्यांना फारसा लाभ झाला नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये स्वत: शेतकरी माल पाठविण्याचे प्रमाण फक्त दहा टक्केच आहे. मार्केटमध्ये शेतकरी दिसतच नाहीत. व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता थेट शेतकऱ्यांकडून खूप कमी माल येत असल्याची माहिती देण्यात आली. गारपिटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. कांदा पिकविण्यासाठी आलेला खर्च भरून काढण्यासाठी कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाची मार्च ते मे दरम्यानच विक्री केली आहे.मुंबईमध्ये फक्त दहा टक्केच माल स्वत: शेतकरी पाठवत आहेत. कधी - कधी हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांवर जाते. उर्वरित ९० टक्के कांदा हा नाशिक, पुणे, कर्नाटक परिसरातील व्यापारीच पाठवत आहेत. ज्यांच्याकडे चाळीमध्ये माल साठविण्याची क्षमता आहे व ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आहे त्यांनी मार्च ते मे दरम्यान १० ते १३ रुपये दराने कांदा विकत घेऊन तो चाळीमध्ये साठवला आहे. भाववाढ झाल्यानंतर हा माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला जात आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज किती शेतकरी येतात याचे सर्वेक्षण केले तरी वास्तव समोर येईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कर्नाटकचाही कांदा मुंबईतमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तसह कर्नाटकचा कांदाही विक्रीसाठी आला आहे. इजिप्तच्या कांद्याचा आकार मोठा असल्यामुळे सामान्य ग्राहकांची त्याला पसंती मिळत नाही. होलसेल मार्केटमध्ये कांदा ४० ते ६० रुपये किलो दरानेच विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर आहेत. गगनाला भिडलेले भाव अद्याप कमी झालेले नाहीत. सरकारने आयातीला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. इजिप्तवरूनही कांदा मागविण्यात आला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये ५६ वाहनांमधून ६२८ टन कांद्याची आवक झाली आहे. ९० टक्के कांदा हा नाशिक, पुणे, कर्नाटक परिसरातील व्यापारीच पाठवत आहेत, उर्वरित माल हा महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिसरातून येत आहे.शेतकरी व ग्राहक दोघांच्याही डोळ्यात पाणी : बाजार समितीमध्ये आलेल्या पुणे जिल्ह्णातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, भाववाढ झाल्यामुळे मुंबईतील ग्राहकांना ८० रुपये किलो दराने कांदा घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना खूप फायदा होत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. परंतु छोट्या शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा मार्च ते मे दरम्यान १० ते १३ रुपये दराने विकला आहे. कारण त्यांना कांदा साठवणे परवडत नाही. परिणामी भाववाढीमुळे शेतकरी व ग्राहक दोघांच्याही डोळ््यांत पाणी आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.