आसनगाव : शहापूर जवळील बामणे गावातील नरेंद्र विठ्ठल गोरे (२५) या नव-या मुलाचा कोशिंबडे, येथील तरूणीसोबत १२ मे रोजी ४:३३ वाजता विवाह ठरला होता. घरात विवाहाची लगीनघाई सुरु असतांनाच नरेंद्र याने लग्नाच्या काही तास आधीच घरातून पळ काढल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. तीन महीन्यांपासून दोन्ही बाजूने विवाहाची तयारी सुरु होती. सर्वत्र लग्नपत्रिका वाटून निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र ऐन वेळी नवरा मुलगा पळून गेल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवरा- नवरीच्या आई, वडीलांनी शहापूर पोलिसात तक्र ार दाखल केली असून नवरा मुलगा बेपत्ता असल्याची तक्र ार नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक अनिल टोणपे यानी दिली. (वार्ताहर/ भरत उबाळे)
बोहल्यावर चढण्याआधीच नवरा मुलगा पळाला (पा)
By admin | Updated: May 12, 2014 23:37 IST