शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

राज्यातील सत्ताबदलानंतरही बेस्टच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: January 19, 2015 05:58 IST

मुंबई महापालिकेने उभारलेल्या मध्य वैतरणा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ५० मे.वॅ. वीजनिर्मितीचे अधिकार राज्यातील मागील सरकारने

संदीप प्रधान, मुंबईमुंबई महापालिकेने उभारलेल्या मध्य वैतरणा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ५० मे.वॅ. वीजनिर्मितीचे अधिकार राज्यातील मागील सरकारने मे. महालक्ष्मी कोनाल ऊर्जा प्रायव्हेट लि. या खासगी कंपनीला दिले होते. महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्टने या विजेवर सातत्याने केलेला दावा सरकारने फेटाळला होता. मात्र आता राज्यात भाजपाप्रणीत सरकार सत्तारूढ झाल्यावरही बेस्टवरील अन्याय दूर करण्याच्या दिशेने हालचाली करण्यात आलेल्या नाहीत.महापालिकेने केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मिळणाऱ्या आर्थिक साहाय्यानुसार केंद्राच्या ३५ टक्के, राज्य शासनाच्या १५ टक्के व महापालिकेच्या ५० टक्के आर्थिक स्रोतांमधून मध्य वैतरणा धरणाची उभारणी केली. या प्रकल्पातून ५० मे.वॅ. विजेची निर्मिती करण्याकरिता १५० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी बेस्ट उपक्रमाने दाखवली होती. ही वीज विकून बेस्टला वर्षाकाठी किमान ४० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले असते. मध्य वैतरणा धरण पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोजनासाठी मुंबई महापालिकेला कार्यान्वित करण्यासाठी दिलेले आहे. त्यापासून जलविद्युत निर्मिती करणे अभिप्रेत नव्हते. त्यामुळे महापालिकेला तशी परवानगी देता येणार नाही, असे मागील सरकारमधील जलसंपदा विभागाने महापालिकेला कळवले. सल्लागारांचा अहवाल प्राप्त झाल्यावर महापालिकेने या प्रकल्पाचा आग्रह धरल्यावर अचानक सरकारने विपरीत भूमिका घेतली. त्यानंतर हा वीजनिर्मिती प्रकल्प मे. महालक्ष्मी कोनाल ऊर्जा प्रा. लि. या कंपनीला दिला. छोट्या जलविद्युत प्रकल्पाबाबतचे जे धोरण राज्य सरकारने २००५ मध्ये जाहीर केले, त्यामधील तरतुदींच्या विरोधात हा निर्णय घेतला. खासगी प्रवर्तकांकडून विकसित करायच्या ५६ जलविद्युत प्रकल्पांची यादी जलसंपदा विभागाने २००८ मध्ये जाहीर केली होती. त्यामध्ये मध्य वैतरणा प्रकल्पाचा उल्लेख नाही. शिवाय प्रकल्प स्थळाची मालकी व जमिनीची मालकी महापालिकेची असताना आणि वीजनिर्मितीकरिता बेस्टने दावा केला असताना सरकारचा जलसंपदा विभाग परस्पर खासगी कंपनीला परवानगी कसा देऊ शकतो, असा सवाल पालिकेतील अधिकारी करीत आहेत.महापालिकेने याकरिता यापूर्वी नियुक्त केलेल्या सल्लागारांना मुदतवाढ देण्याचा विषय स्थायी समितीसमोर आला, तेव्हा सल्लागारांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेऊन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही मागील सरकारचा निर्णय कायम ठेवण्याचे संकेत दिले.