शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पंधरवड्यानंतरही शिरूरच्या बालगृहात मुली आल्याच नाहीत

By admin | Updated: July 4, 2016 01:28 IST

शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरी येथील शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींना बालगृहात आणण्यात आले नसून

शिरूर : शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरी येथील शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींना बालगृहात आणण्यात आले नसून, या मुली बालगृहात का नाहीत, या प्रश्नाचे उत्तर देण्यास जबाबदार अधिकारीच उपस्थित नाहीत. गेल्या आठ वर्षांपासून या मुलींची हेळसांड सुरू असून, महिला व बालकल्याण खात्याचे या बालगृहाकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. एकीकडे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासन सांगत आहे. तर, या बालगृहातील मुलींचे भवितव्य अधांतरी राहिल्याचे वास्तव आहे. बालगृहात एक पालक (आर्थिक दुर्बल) तसेच काही अनाथ मुली आहेत. बालगृहात २८ मुली आहेत. यातील काही मुली नगर परिषद, काही मुली विद्याधाम, तर काही मुली न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होत्या. २०१५-१६ हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मुली उन्हाळ््याच्या सुटीत घरी पाठविण्यात आल्या. अनाथ मुली पुणे येथे दुसऱ्या संस्थेत पाठविण्यात आल्या. दरवर्षी मुली उन्हाळ्यात सुटीसाठी जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा शाळेत येतात. या वर्षी १४ जूनला शाळा सुरू झाली. मात्र, आज शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरी मुली बालगृहात परतल्या नाहीत. आज ‘लोकमत’ तसेच आरटीआय कार्यकर्ते संजय पाचंगे व यशस्विनी अभियानाच्या सचिव नम्रता गवारी यांनी बालगृहास भेट दिली असता, नेहमीप्रमाणे बालगृहाच्या निवासी अधीक्षिका एस. व्ही. भोरकर या बालगृहात नव्हत्या. भोरकर या बालगृहात रुजू झाल्यापासून फार कमी हजर राहिल्या. निवासी तर एकही दिवस नाही. (वास्तविक त्यांची नियुक्तीच निवासी असताना) बालगृहाच्या लिपिकाने हे बालगृह केवळ अनाथ मुलींसाठी ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे सांगितले. यामुळे बालगृहातील एक पालक असलेल्या मुलींना पुन्हा या बालगृहात आणले जाणार नाही, असे सांगितले. भोरकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही. बालगृहाच्या महिला काळजी वाहक यांनी सांगितले, की संस्थेत वीज व पाणी नसल्याने मुलींना बालगृहात बोलावण्यात आले नाही. सुटी संपल्यावर यातील मुली बालगृहात परतल्या होत्या. मात्र, त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. या मुली घरीच असल्याने त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे भवितव्य अधांतरी आहे. (वार्ताहर)>अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; आंदोलनाचा इशारा महिला बालकल्याण विभागाने या मुलींची थट्टा चालवली असून, या उपेक्षित मुलींना आता शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी पाचंगे यांनी केली आहे. यशस्विनीने आंदोलन केले तेव्हा तहसीलदारांनी या बालगृहावर नियंत्रणासाठी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही आश्वासन पाळले नसल्याचा आरोप पाचंगे यांनी केली. या मुलींना दोन दिवसांत बालगृहात परत आणून त्यांना शाळेत दाखल करण्याची मागणी पाचंगे व गवारी यांनी केली असून, तसे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला .