शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गार्इंनाही ‘आधार’कार्ड

By admin | Updated: April 25, 2017 02:47 IST

कोट्यवधी नागरिकांना दिलेली ‘आधार’ कार्ड आणि त्यांची सक्ती हा वादाचा विषय ठरलेला असताना, आता देशातील प्रत्येक गाईला आणि तिच्या वासरांनाही

नवी दिल्ली : कोट्यवधी नागरिकांना दिलेली ‘आधार’ कार्ड आणि त्यांची सक्ती हा वादाचा विषय ठरलेला असताना, आता देशातील प्रत्येक गाईला आणि तिच्या वासरांनाही १४ आकडी ‘आधार’ क्रमांक देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने केला आहे.भारतातून बांगलादेशात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तस्करीस आळा घालण्याचा विषय मध्यंतरी एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता. तेव्हा न्यायालयाने सरकारला यावर काय करता येऊ शकेल, असे विचारले होते. याचे उत्तर म्हणून सरकारने न्यायालयात जो अहवाल सादर केला त्यात गाईंनाही ‘आधार’ कार्ड देण्याचा प्रस्ताव आहे. गार्इंची तस्करी रोखायची असेल व त्यांना सुरक्षा द्याययी असेल तर प्रत्येक गाईचे आणि गोवंशाचे सतत ‘ट्रॅकिंग’ करणे गरजेचे आहे. ‘आधार’ क्रमांकाने हे शक्य होईल,असे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. भाकड झाल्यानंतर मालकांनी बेवारस सोडून दिलेल्या गाई हेच तस्करांचे प्रमुख लक्ष़्य ठरत असल्याने अशा बेवारस गार्इंची सुरक्षा व काळजी घेणे ही प्रामुख्याने राज्य सरकारांची जबाबदारी आहे, असे नमूद करून सरकारचा हा अहवाल म्हणतो की, प्रत्येक जिल्ह्यात अशा किमान ५०० बेवारस गार्इंचा सांभाळ करता येईल असे पांजरपोळ/ निवारेही उभारणे गरजेचे आहे. दुधाचे वय उलटून गेलेल्या जनावरांची विशेष काळजी घेण्याच्या आणि शेतकऱ्यांची हालाखीची स्थिती सुधारण्याच्या गरजेवरही या अहवालात भर देण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)