शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

गार्इंनाही ‘आधार’कार्ड

By admin | Updated: April 25, 2017 02:47 IST

कोट्यवधी नागरिकांना दिलेली ‘आधार’ कार्ड आणि त्यांची सक्ती हा वादाचा विषय ठरलेला असताना, आता देशातील प्रत्येक गाईला आणि तिच्या वासरांनाही

नवी दिल्ली : कोट्यवधी नागरिकांना दिलेली ‘आधार’ कार्ड आणि त्यांची सक्ती हा वादाचा विषय ठरलेला असताना, आता देशातील प्रत्येक गाईला आणि तिच्या वासरांनाही १४ आकडी ‘आधार’ क्रमांक देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने केला आहे.भारतातून बांगलादेशात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तस्करीस आळा घालण्याचा विषय मध्यंतरी एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता. तेव्हा न्यायालयाने सरकारला यावर काय करता येऊ शकेल, असे विचारले होते. याचे उत्तर म्हणून सरकारने न्यायालयात जो अहवाल सादर केला त्यात गाईंनाही ‘आधार’ कार्ड देण्याचा प्रस्ताव आहे. गार्इंची तस्करी रोखायची असेल व त्यांना सुरक्षा द्याययी असेल तर प्रत्येक गाईचे आणि गोवंशाचे सतत ‘ट्रॅकिंग’ करणे गरजेचे आहे. ‘आधार’ क्रमांकाने हे शक्य होईल,असे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. भाकड झाल्यानंतर मालकांनी बेवारस सोडून दिलेल्या गाई हेच तस्करांचे प्रमुख लक्ष़्य ठरत असल्याने अशा बेवारस गार्इंची सुरक्षा व काळजी घेणे ही प्रामुख्याने राज्य सरकारांची जबाबदारी आहे, असे नमूद करून सरकारचा हा अहवाल म्हणतो की, प्रत्येक जिल्ह्यात अशा किमान ५०० बेवारस गार्इंचा सांभाळ करता येईल असे पांजरपोळ/ निवारेही उभारणे गरजेचे आहे. दुधाचे वय उलटून गेलेल्या जनावरांची विशेष काळजी घेण्याच्या आणि शेतकऱ्यांची हालाखीची स्थिती सुधारण्याच्या गरजेवरही या अहवालात भर देण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)