शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

ऊसदर नियामक मंडळाची स्थापना

By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST

आज अधिकृत घोषणा : विक्रमसिंह घाटगे, राजू शेट्टींसह १२ जणांचा समावेश

कोल्हापूर : ऊसदर ठरविण्यासाठी सहकार खात्याने आज, शुक्रवारी ऊसदर नियामक मंडळाची स्थापना केली. अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असून उद्या, शनिवारी याची अधिकृत घोेषणा होण्याची शक्यता आहे. नियामक मंडळात विक्रमसिंह घाटगे, खासदार राजू शेट्टी यांच्यासह बाराजणांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. दरवर्षी उसाच्या दरासाठी होणाऱ्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने गेल्यावर्षी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ऊसदर नियामक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. या मंडळात कोणाची वर्णी लावायची हेही ठरले होते; पण त्याला मूर्त स्वरूप आले नाही. त्यामुळे यावर्षीही ऊसदराची कोंडी होणार असे वाटत होते; पण भाजप सरकारने सत्तेवर येताच तातडीने नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागाने आज बाराजणांचे नियामक मंडळ तयार केले. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, तीन सहकारी साखर कारखान्यांचे, दोन खासगी साखर कारखान्यांचे व दोन इतर असे बारा जणांचे मंडळ तयार केले असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यावर स्वाक्षरी होणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)ऊसदराची कोंडी फुटणार!ऊस दर नियामक मंडळाची स्थापना झाल्यानंतर येत्या आठ दिवसांत सदस्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे ऊसदराची कोंडी लवकर फुटण्यास मदत होणार आहे. रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात असून, अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. बारा जणांच्या या मंडळात सर्वच घटकांना संधी दिली आहे. या मंडळाची पहिली बैठक आठवड्यात होऊन ऊस दराची कोंडी फोडली जाईल. - चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्रीनियामक मंडळाची स्थापना स्वागतार्ह आहे. नुसती स्थापना करून चालणार नसून, कारखानदारीवर मंडळाचा अंकुश हवा. मंडळाने सुचविलेला दर न देणाऱ्या कारखानदारांना दोन वर्षांच्या शिक्षेच्या तरतुदीचा समावेश यामध्ये हवा. यासाठी प्रयत्नशील राहू. - राजू शेट्टी, खासदार संजय पाटील मुख्यमंत्र्यांना भेटलेविक्रमसिंह घाटगे (संस्थापक, ‘शाहू’ कागल) खासदार विजयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष, राज्य साखर संघ) जयप्रकाश दांडेगावकर (माजी सहकार राज्यमंत्री) बी. बी. ठोंबरे श्री. दिवेकर (पूर्ती शुगर्स) खासदार राजू शेट्टी रघुनाथदादा पाटील --पृथ्वीराज जाचकराज्याचे मुख्य सचिव या नियामक मंडळाचे अध्यक्ष असतील.