शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राज्य पुनर्रचना आयोग स्थापन व्हावा

By admin | Updated: April 10, 2016 02:58 IST

सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची

नागपूर : सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी येथे केले.युगांतर शिक्षण संस्थेच्या सभागृहात ‘लहान राज्यांची संकल्पना व विकास’ या विषयावर मा. गो. वैद्य बोलत होते. राजकुमार तिरपुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा. गो. वैद्य म्हणाले, लोकसंख्या व लोकांचे हित हे निकष ठरवून नवीन राज्याची निर्मिती करण्यात यावी. ही निर्मिती करीत असताना नवीन राज्याची लोकसंख्या कमाल ३ कोटी आणि किमान ५० लाख असावी, अशी आपली अपेक्षा आहे. परंतु आयोग किंवा शासन त्यांना वाटते तसे निकष ते गृहीत धरू शकतात. (प्रतिनिधी)राज यांनाही एक दिवस जायचे आहेमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाचा विरोध करताना मा. गो. वैद्य यांच्यावर टीका केली होती. वैद्य यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ झाली आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याला मा. गो. वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना जी भाषा येते, ते त्याच भाषेचा वापर करणार. मी म्हातारा झालो आहे, आज ना उद्या जाणारच आहे. प्रत्येकाला जायचेच आहे. त्यांनाही एक दिवस जायचे आहे, असे ते म्हणाले.मी ९३ वर्षांचा आहे. आणखी ७ वर्षे जगण्याची माझी इच्छा आहे. कुणी पिस्तूल घेऊन माझ्यावर गोळी झाडली तर गोष्ट वेगळी, अन्यथा ७ वर्षांनी शतक साजरे करेन, असे वैद्य यांनी सांगितले.संघाचे दायित्व माझ्याकडे नाहीमी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता होतो; पण आता नाही. त्यामुळे हे माझे व्यक्तिगत मत आहे. संघाशी त्याचा काहीही संबंध नाही. संघाने स्वतंत्र विदर्भाबाबत उघड भूमिका कधीही घेतली नाही. मात्र त्यांच्या संघटनात्मक रचनेत त्यांनी विदर्भ हे स्वतंत्र राज्य मानलेले आहे, असे मा. गो. वैद्य म्हणाले.स्वतंत्र विदर्भाचे समर्थनस्वतंत्र विदर्भ राज्य हे अपरिहार्य आहे. त्याचे मी समर्थन करतोच. परंतु मी जे वक्तव्य केले होते, ते केवळ विदर्भाशीच संबंधित नव्हते; तर एकूणच भारताच्या संबंधात होते. नवीन राज्याची निर्मिती ही लोकांची आवश्यकता, सुविधा व हिताचा विचार करून झाली पाहिजे. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये. परंतु आपल्याकडे आंदोलन केल्याशिवाय नवीन राज्याची निर्मितीच केली जात नाही, ही बाब चांगली नाही, असे त्यांनी सांगितले.माझे निकष मान्य केले तर महाराष्ट्राची चार राज्ये होतील. एका भाषेची अनेक राज्ये झाली तर वाईट काय आहे, असा सवाल करून मा. गो. वैद्य म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर मराठी भाषेचे वा अस्मितेचे कुठलेही नुकसान होणार नाही.