शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

राज्य पुनर्रचना आयोग स्थापन व्हावा

By admin | Updated: April 10, 2016 02:58 IST

सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची

नागपूर : सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी येथे केले.युगांतर शिक्षण संस्थेच्या सभागृहात ‘लहान राज्यांची संकल्पना व विकास’ या विषयावर मा. गो. वैद्य बोलत होते. राजकुमार तिरपुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा. गो. वैद्य म्हणाले, लोकसंख्या व लोकांचे हित हे निकष ठरवून नवीन राज्याची निर्मिती करण्यात यावी. ही निर्मिती करीत असताना नवीन राज्याची लोकसंख्या कमाल ३ कोटी आणि किमान ५० लाख असावी, अशी आपली अपेक्षा आहे. परंतु आयोग किंवा शासन त्यांना वाटते तसे निकष ते गृहीत धरू शकतात. (प्रतिनिधी)राज यांनाही एक दिवस जायचे आहेमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाचा विरोध करताना मा. गो. वैद्य यांच्यावर टीका केली होती. वैद्य यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ झाली आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याला मा. गो. वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना जी भाषा येते, ते त्याच भाषेचा वापर करणार. मी म्हातारा झालो आहे, आज ना उद्या जाणारच आहे. प्रत्येकाला जायचेच आहे. त्यांनाही एक दिवस जायचे आहे, असे ते म्हणाले.मी ९३ वर्षांचा आहे. आणखी ७ वर्षे जगण्याची माझी इच्छा आहे. कुणी पिस्तूल घेऊन माझ्यावर गोळी झाडली तर गोष्ट वेगळी, अन्यथा ७ वर्षांनी शतक साजरे करेन, असे वैद्य यांनी सांगितले.संघाचे दायित्व माझ्याकडे नाहीमी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता होतो; पण आता नाही. त्यामुळे हे माझे व्यक्तिगत मत आहे. संघाशी त्याचा काहीही संबंध नाही. संघाने स्वतंत्र विदर्भाबाबत उघड भूमिका कधीही घेतली नाही. मात्र त्यांच्या संघटनात्मक रचनेत त्यांनी विदर्भ हे स्वतंत्र राज्य मानलेले आहे, असे मा. गो. वैद्य म्हणाले.स्वतंत्र विदर्भाचे समर्थनस्वतंत्र विदर्भ राज्य हे अपरिहार्य आहे. त्याचे मी समर्थन करतोच. परंतु मी जे वक्तव्य केले होते, ते केवळ विदर्भाशीच संबंधित नव्हते; तर एकूणच भारताच्या संबंधात होते. नवीन राज्याची निर्मिती ही लोकांची आवश्यकता, सुविधा व हिताचा विचार करून झाली पाहिजे. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये. परंतु आपल्याकडे आंदोलन केल्याशिवाय नवीन राज्याची निर्मितीच केली जात नाही, ही बाब चांगली नाही, असे त्यांनी सांगितले.माझे निकष मान्य केले तर महाराष्ट्राची चार राज्ये होतील. एका भाषेची अनेक राज्ये झाली तर वाईट काय आहे, असा सवाल करून मा. गो. वैद्य म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर मराठी भाषेचे वा अस्मितेचे कुठलेही नुकसान होणार नाही.