शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पारदर्शक कामासाठी समितीची स्थापना

By admin | Updated: April 5, 2017 00:55 IST

राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि कार्यक्षमता वाढावी

पुणे : राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि कार्यक्षमता वाढावी, यासाठी शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकांच्या कामकाजासंदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व निश्चित करण्याबरोबरच नागरी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. राज्य घटनेच्या ७४व्या घटनादुरुस्तीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या जनतेशी संबंधित व नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी या संस्थांमार्फत केली जाते. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातच जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरीकरणाच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होत आहे.महानगरपालिका आणि नगरपालिकासंबंधी कायद्यात सुधारणा किंवा तरतुदी करणे आवश्यक आहे का? याबाबत ही समिती शिफारसी करणार आहे. त्याचबरोबर विविध समित्या, प्राधिकरणे यांच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अभ्यास करून नागरी संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढीसाठी उपाययोजना सुचविणार आहे. >महाराष्ट्रात नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ५0 टक्क्यांनी वाढले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरीकरणाचा वेग अधिक आहे. नागरी क्षेत्रातील जनतेकरिता सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम महानगरपालिका व नगरपालिका या स्थानिक संस्थांमार्फत केले जाते. त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या स्वायतत्तेबरोबरच त्यांच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व व कार्यक्षमता असणे आवश्यक आहे. यासंदर्भातील शिफारसी करण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.