शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्हानिहाय एकच मंडळ स्थापन करा

By admin | Updated: April 8, 2017 03:25 IST

मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली

मुंबई : माथाडी कामगारांसाठी उद्योगनिहाय स्वतंत्र मंडळे ठेवण्याऐवजी संपूर्ण मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची उणीव यांमुळे मुंबईतील माथाडी मंडळांचा कारभार डबघाईला आला असल्याचा आरोप युुनियनने केला आहे.युनियनच्या म्हणण्यानुसार, राज्यात ३६ माथाडी मंडळे असून त्यातील १० मंडळे एकट्या मुंबईत आहेत. मात्र यांमधील कोणत्याही मंडळांवर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिव नेमलेला नाही. एकच अधिकारी दोन ते चार मंडळांचा कारभार पाहत असून, आठवड्यातून एखादा दिवस मंडळाच्या कार्यालयात उपस्थित असतात. अन्य कर्मचाऱ्यांचीही कार्यालयात वाणवा दिसते. परिणामी, मंडळाच्या कामकाजावर परिणाम झाला असून संबंधित माथाडी कामगारांना न्याय मिळत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी सांगितले की, सरकारने प्रत्येक मंडळावर अध्यक्ष व सचिवांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी युनियन सातत्याने करत आहे. मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नसून, काही मंडळांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांखाली घसरली आहे. वेळेवर पगार न होणे, मालकांकडून होणारा अन्याय दूर न होणे, निवृत्तीनंतरचे लाभ वेळेवर न मिळणे अशा अनुभवांना कामागारांना सामोरे जावे लागत आहे.नव्या मालक व कामगारांची नोंदणी होत असून आस्थापनांची तपासणीही होत नाही. या गोष्टींचा फायदा घेऊन माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात मालक मंडळी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही रामिष्टे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)...तर कामगारांची ससेहोलपट थांबेलउद्योगनिहाय स्वतंत्र मंडळ ठेवण्याऐवजी जिल्हानिहाय एकच मंडळ ठेवल्यास एकच पूर्णवेळ अध्यक्ष व सचिव सगळे काम पाहू शकतील. तसेच वेगवेगळ्या मंडळांमध्ये काम करणारे कर्मचारी एकाच छताखाली आल्यामुळे परिणामकारक काम होऊन कामगारांची ससेहोलपट थांबेल.कार्यक्षेत्रामुळे कार्यक्षमतेवर परिणाम!मुंबईतील १० मंडळांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण मुंबई शहरासोबत ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेले आहे. अवाढव्य कार्यक्षेत्रामुळे मंडळाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. शिवाय कामगारांनाही मंडळांच्या कार्यालयात येण्यासाठी मुंबई किंवा नवी मुंबईत धाव घ्यावी लागते. त्याऐवजी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा प्रत्येक जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र मंडळांची निर्मिती केल्यास कामात सुटसुटीतपणा येईल. मालकांच्या कुकर्माला आळा बसेल!काही माथाडी कामगारांच्या कामाला दोन विविध मंडळांच्या योजना लागू होतात. याचा गैरफायदा घेऊन काही मालक दोन्ही मंडळांकडे बोटे दाखवत कुठल्याच मंडळाचे आदेश पाळत नाहीत. अशा प्रकरणांना एकच मंडळ केल्यास आळा बसेल.