शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

अण्णांच्या सुरक्षेत त्रुटी - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 11, 2016 04:19 IST

पोलीस मोबाइलमध्ये व्यस्त असतात,’ असे सांगत अण्णा हजारे यांनी त्यांना पुरविलेल्या संरक्षण यंत्रणेचे वाभाडे काढले होते.

पारनेर (जि. अहमदनगर) : ‘पोलीस मोबाइलमध्ये व्यस्त असतात,’ असे सांगत अण्णा हजारे यांनी त्यांना पुरविलेल्या संरक्षण यंत्रणेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी कबूल करीत दिलगिरी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठविले आहे. अण्णा हजारे यांनी संरक्षण काढून घेण्याची विनंती करणारे पत्र दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते़ त्यानंतर बुधवारी सायंकाळी राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्णप्रकाश यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर रात्रीच मुख्यमंत्र्यांचे पत्र अण्णांना मिळाले. पोलीस सुरक्षा व्यवस्थेतील उणिवांची दखल घेतल्याचे नमूद करीत मुख्यमंत्र्यांनी अण्णांची माफी मागितली़ या पत्रात म्हटले आहे की, आपल्या संरक्षणाबाबत पोलीस दक्ष असावेत, आपल्या दौऱ्यात वाहन व अंगरक्षक कायम सोबत असणार आहे. बेशिस्त पोलीस व अधिकारी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तुम्हाला परिपूर्ण संरक्षण व्यवस्था पुरविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, जनसामान्यांकरिता आपले जीवन बहुमूल्य आहे. समाजकंंटकापासून जीविताला धोका होण्याची शक्यता असल्याने आपल्याला संरक्षण पुरविण्यात आले आहे. तुमचे संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य असल्याने आपण सुरक्षा मागे घेण्याची विनंती करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अण्णांना पत्रात केली आहे. (प्रतिनिधी)