शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद मिटवा अन् आक्रमक व्हा

By admin | Updated: June 26, 2016 04:52 IST

संघटनात्मक पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यात काही मतभेद असतील तर ते त्वरीत मिटवा अन्यथा महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, प्रदेश स्तरावरून या मतभेदांची

पुणे : संघटनात्मक पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यात काही मतभेद असतील तर ते त्वरीत मिटवा अन्यथा महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, प्रदेश स्तरावरून या मतभेदांची दखल घ्यायला लावू नका असा इशारा देत महापालिकेत आक्रमक होण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर रस्त्यावरील एका हॉटेलात नगरसेवकांची बैठक घेतली. निवडणुकांबाबत विविध विषयांवर माहिती घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालक मंत्री गिरीष बापट, समाजकल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिकेतील गटनेते गरेश बीडकर सर्व नगरसेवक, शहर शाखेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काही नगरसेवकांनी बैठकीत पक्षाच्या शहरातील नेत्यांबाबत तक्रारी केल्या. त्यांच्याकडून विश्वासात घेतले जात नाही, पक्षाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण मिळत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी काही नेत्यांचे नाव घेऊन केल्या गेल्या. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महापालिकेची निवडणूक कोणत्याही स्थितीत आपल्याला जिंकायची आहे. स्वतंत्र लढायचे की युती करून ते नंतर ठरेल, मात्र स्वबळावर लढण्यासाठी पुर्ण सज्ज रहा. तुमचे सगळे मतभेद मिटवून टाका. सभागृहात आक्रमक व्हा. विरोधक काहीही आरोप करतील. तुमच्या विकासकामांनीच त्याला उत्तर द्या. केंद्र व राज्य सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत न्या. या निवडणुकीच्या निकालाचा संबध राज्य तसेच केंद्र सरकारच्या कामगिरीशी जोडला जाणार आहे, त्यामुळे पक्षीय मतभेद विसरून एकदिलाने, एकविचाराने निवडणुकीला सामोरे जा. सरकार आपले आहे, मात्र म्हणूनच जबाबदारीने वागावे असेही त्यांनी सांगितले. छोटीशी चूकही महाग ठरू शकते, त्यामुळे काळजी घ्या.’’पुण्यातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हाला उत्तरे देता येत नाहीत. विकास आराखडा, झोपडपट्टी विकास प्राधीकरण याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत सर्व प्रशसुटलेले आहेत. योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विकास आराखड्यात बदल होणार विकास आराखडा सरकार नियुक्त समितीने घेतला असला तरी त्यातील अनेक चुकांवर सुधारणा नाही. समितीने विकास आराखड्यातील आवश्यक असलेली बरीच आरक्षणे उठविली आहेत. त्याबाबत सरकार स्तरावर विचार व्हावा अशी मागणी नरगेसवकांनी केली. त्यावर अजून निर्णय होत असून बदल होतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाच्या नियमावलीबाबतची बदल होण्याची आवश्यकता काही नगरसेवकांनी व्यक्त केला. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.